क्लीनअप मार्शलचे कंत्राट रद्द; पावणे पाच लाखांच्या पुस्तकांचा हिशोब लागेना

  38

मुंबई : मुंबई महापालिकेने यापूर्वी नेमलेल्या क्लीन अप मार्शल योजना मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आणल्यानंतरही काही संस्थांनी आकारण्यात येणाऱ्या शुल्कांच्या पावती पुस्तके महापालिकेला परत केलेली नाहीत. महापालिकेच्या गोरेगाव पी दक्षिण विभागात अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने पावती पुस्तकच जमा न केल्याने महापालिकेचे तब्बल पावणे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार गोरेगावमध्ये घडला असला तरी मुंबईतील सर्वच प्रभागांमध्ये अशाप्रकारे पुस्तके जमा न केल्याने महापालिकेला लाखो रुपयांचा चुना लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या क्लीन अप मार्शलला दिलेल्या पावती पुस्तकांचा हिशोब लागत नसल्याने या प्रकरणाची वासलात कशी लावणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.


मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने क्लीन अप मार्शल नियुक्त करण्यासाठी संस्थांच्या नेमणूक केल्या. यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येक संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये महापालिकेच्या पी दक्षिण विभागाच्यावतीने सुपर प्रोटेक्शन सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नेमणूक केली होती. परंतु या क्लीन अप मार्शलचे कंत्राट ३१ मार्च २०२२मध्ये संपुष्टात आल्यानंतरही संबंधित संस्थेने त्यांना दिलेली पावती पुस्तके परत केलेली नाही. या संस्थेला २५ पावत्या असलेली ४५ पावती पुस्तके व ५० पावत्या असलेली २५ पावती पुस्तके वितरीत करण्यात आली. परंतु, ही पावती पुस्तके कंत्राटदाराने ३० जून २०२३ पर्यंत तरी परत केली नव्हती असे मुख्य लेखापरिक्षकांच्या अहवालातून नमुद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर जोरदार फायरिंग, Video पोस्ट करत गँगस्टरने घेतली जबाबदारी

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील सरे शहरातील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार केल्याची घटना समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत उच्चस्तरीय बैठक

मुंबई : अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री

इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही – आशिष शेलार

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करावे -राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती मुंबई : ‘इतिहासाचे

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यास राज्य शासन प्राधान्य देत आहे. राज्यात

नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठागौरी विसर्जन दिवशी मुंबईत शासकीय कार्यालयांना सुटी

मुंबई : सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठागौरी विसर्जन

बलात्काराची खोटी तक्रार दाखल करुन १ कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी माजी बँक कर्मचारी गजाआड!

मुंबई : मुंबईतील चारकोप पोलिसांनी माजी बँक कर्मचारी डॉली कोटकला अटक केली आहे. तिच्यावर आपल्या माजी प्रियकरावर, जो