क्लीनअप मार्शलचे कंत्राट रद्द; पावणे पाच लाखांच्या पुस्तकांचा हिशोब लागेना

मुंबई : मुंबई महापालिकेने यापूर्वी नेमलेल्या क्लीन अप मार्शल योजना मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आणल्यानंतरही काही संस्थांनी आकारण्यात येणाऱ्या शुल्कांच्या पावती पुस्तके महापालिकेला परत केलेली नाहीत. महापालिकेच्या गोरेगाव पी दक्षिण विभागात अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने पावती पुस्तकच जमा न केल्याने महापालिकेचे तब्बल पावणे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार गोरेगावमध्ये घडला असला तरी मुंबईतील सर्वच प्रभागांमध्ये अशाप्रकारे पुस्तके जमा न केल्याने महापालिकेला लाखो रुपयांचा चुना लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या क्लीन अप मार्शलला दिलेल्या पावती पुस्तकांचा हिशोब लागत नसल्याने या प्रकरणाची वासलात कशी लावणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.


मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने क्लीन अप मार्शल नियुक्त करण्यासाठी संस्थांच्या नेमणूक केल्या. यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येक संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये महापालिकेच्या पी दक्षिण विभागाच्यावतीने सुपर प्रोटेक्शन सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नेमणूक केली होती. परंतु या क्लीन अप मार्शलचे कंत्राट ३१ मार्च २०२२मध्ये संपुष्टात आल्यानंतरही संबंधित संस्थेने त्यांना दिलेली पावती पुस्तके परत केलेली नाही. या संस्थेला २५ पावत्या असलेली ४५ पावती पुस्तके व ५० पावत्या असलेली २५ पावती पुस्तके वितरीत करण्यात आली. परंतु, ही पावती पुस्तके कंत्राटदाराने ३० जून २०२३ पर्यंत तरी परत केली नव्हती असे मुख्य लेखापरिक्षकांच्या अहवालातून नमुद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईत पाऊसच आगमन

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने मुंबईकरांना आनंदाचा सुखत धक्का बसला आहे. वाढत्या

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इक्बाल सिंग चहल मुख्य निरीक्षक

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला

नव्या विमानतळाच्या धावपटटीच्या कार्यक्ष्मतेसाठी ‘टॅक्सीवे एम’ कार्यान्वित

गर्दीच्या वेळी आगमन आणि प्रस्थानाचा गोंधळ टळणार मुंबई : जगातील सर्वात जास्त व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक

मध्य रेल्वेला पार्सल वाहतुकीतून १८३ कोटी रुपयांची कमाई

मुंबई : चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने नियोजित पार्सल गाड्या, भाडेतत्त्वावरील पार्सल गाड्या आणि मागणीनुसार

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती मुंबई : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण

समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

भिवंडी बायपास रस्त्याचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार मुंबई : भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम