Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने नियोजित करता यावा, यासाठी मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या तयारीच्या आणि आरक्षण चार्टच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय वेस्टर्न रेल्वेने घेतला आहे. रेल्वेचे तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांचे नाव, कोच क्रमांक आणि बर्थची माहिती असलेले आरक्षण चार्ट तयार केले जातात. स्थानक किंवा दूरच्या स्थानकातून ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी ही यादी प्रसिद्ध केली जाते. पण आता हा चार्ट आठ तास आधी जारी केला जाईल.



सेवा कधी सुरु होणार?



१४ जुलैपासून याची अंमलबजावणी केली जाईल, पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या अर्धा तास आधीच अंतिम आरक्षण चार्ट तयार केला जाईल. प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील.





सुधारित वेळापत्रकानुसार,



सकाळी ०५:०१ ते दुपारी २:०० या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण चार्ट आता आदल्या दिवशीच्या रात्री ९:०० वाजता तयार केला जाईल.


दुपारी २:०१ ते ४:० या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण तक्ता त्या दिवशी सकाळी ७:३० वाजता तयार होईल.


सायंकाळी ४:०१ ते रात्री ११:५९ आणि मध्यरात्री ००:०० ते सकाळी ०५:०० या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण चार्ट नियोजित प्रस्थान वेळेच्या आठ तास आधी तयार जाहीर केला जाईल.


रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दुसऱ्या आरक्षण चार्टच्या नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही. ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या ३० मिनिटे आधीच अंतिम आरक्षण चार्ट तयार केला जाईल. प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील. हा निर्णय प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करता यावे आणि शेवटच्या क्षणी गोंधळ व गर्दी टाळता यावी या उद्देशाने घेतला आहे.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक