Navi Mumbai Airport : ग्रीन वीज अन् ग्रीन एअरपोर्ट! नवी मुंबईच्या विमानतळाची खासियत; कधी होणार सुरु?

नवी मुंबई : नवी मुंबईच्या विमानतळाचं काम पूर्ण होत आलंय. आता लवकरच नवी मुंबईचं हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. हे विमानतळ कधी सुरु होणार तसेच या विमानतळाची खासियत काय असणार? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. तसेच या विमानतळासाठी एक मोठी कनेक्टिव्हिटीही तयार करणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



जगातील सर्वात फास्ट बॅगेज क्लेम व्यवस्था


‘आज नवीन मुंबईत विमानतळ याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मी आणि शिंदे आलो. आता त्याच्या प्रगतीसाठीचं सादरीकरण पाहिलं. रनवे पासून टर्मिनल बिल्डिंग पर्यंतची प्रगती पाहिली. साधारणपणे याची भौतिक प्रगती ९४ टक्के झाली आहे. रनवे सुसज्जित आहे. टर्मिनल बिल्डिंगचं काम झालं. इंटिरियरचं काम सुरू आहे. बाहेरच्या सिलिंगचं काम वेगानं सुरू आहे. बॅगेज हँडलिंगची सिस्टिम पाहिली. अत्यंत चांगली सिस्टिम आहे. बॅगेचा बारकोड ३६ डिग्रीतून पाहता येईल. ती योग्य ठिकाणी जाईल. या एअरपोर्टवर बॅगेज क्लेम ही व्यवस्था जगातील फास्टेट व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेव्हा पूर्ण एअरपोर्ट होईल तेव्हा दोन रनवे या क्षमतेने ९ कोटी प्रवाशांसाठी एअरपोर्ट सुसज्ज होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट पेक्षा खूप मोठा एअरपोर्ट होणार आहे. हा ग्रीन एअरपोर्ट आहे. ग्रीन वीज वापरली जाणार आहे, अल्टरनेट फ्यूलची वाहने असणार आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.



‘एक मोठी कनेक्टिव्हिटीही तयार करणार’


पुढे फडणवीस म्हणाले, ‘आपली विमाने जी फ्यूल वापरतात ती ग्रीन असेल हा प्रयत्न असेल. एक मोठी कनेक्टिव्हिटीही आपण तयार केली आहे. वॉटर ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली जाणार आहे. शहरातच बॅगेज चेकिंगची व्यवस्था करू. त्यांना बॅगेज शिवाय येता येणार आहे. अंडर ग्राऊंड मेट्रो एअरपोर्टला तयार करू. ती सर्व एअरपोर्टला कनेक्टेड असतील. त्यामुळे पायी चालावं लागणार नाही. तसेच वाहन घेऊन येण्याची गरज पडणार नाही.’



कधी सुरु होणार ?


नवी मुंबईतील विमानतळ कधी सुरु होणार याविषयी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘काही विमानतळावर एक एक किलोमीटर पायी चालावं लागतं. इथे ट्रॅव्हलेटर तयार करण्यात आलं आहे. देशातील सर्वात आधुनिक एअरपोर्ट तयार होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत विमानतळ पूर्ण करण्याचं टार्गेट दिलं आहे. पंतप्रधानांचीही वेळ घेणार आहे. १३ ते १४ हजार कामगार रोज काम करत आहे. कामगारांची संख्या दुप्पट तिप्पट वाढवायला सांगितली आहे.’


Comments
Add Comment

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रासह नऊ राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या केल्या असून

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त

मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर

नवी मुंबईत घरगुती ट्युशन क्लासचा स्लॅब कोसळला, एका मुलाचा मृत्यू आणि १० मुले जखमी

कोपरखैरणे : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सेक्टर दोनमधील प्लॉट क्रमांक १२ येथे विद्याभवन अपार्टमेंटमधील

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग