परभणी: शेतात काम करताना वीजेचा धक्का लागून शेतकरी व दोन बैलांचा दुर्दैवी अंत

परभणी : पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण (बु) शिवारात आज सकाळी (शुक्रवार) एक हृदयद्रावक घटना घडली. कापसाच्या आंतरमशागतीचे काम करत असताना, लोखंडी औताला विद्युत खांबावरील तारेचा स्पर्श झाल्याने एका शेतकऱ्यासह त्याच्या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद गोपाळराव घाडगे (वय ४०) हे त्यांचे भाऊ विकास घाडगे यांच्यासोबत त्यांच्या शेतात कापसाच्या पिकाची आंतरमशागत करत होते. बैलजोडीच्या सहाय्याने बैल पाळीचे काम सुरू असताना, शेतातील विद्युत खांबाला आधार देणाऱ्या तारेला लोखंडी औताचा स्पर्श झाला. त्या तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने प्रल्हाद घाडगे आणि त्यांच्या दोन्ही बैलांना जोरदार धक्का बसला. विद्युत प्रवाहाची तीव्रता अधिक असल्याने क्षणार्धातच तिघांचाही जागीच मृत्यू झाला.


प्रल्हाद यांच्या पाठीमागे खताची पेरणी करत असलेले त्यांचे भाऊ विकास घाडगे यांना मात्र करंट लागला नाही. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा भाऊ आणि बैल मृत्यूमुखी पडल्याचे पाहून त्यांनी आरडाओरड केली. ग्रामस्थांच्या मदतीने प्रल्हाद घाडगे यांना तातडीने पाथरी येथील खासगी रुग्णालयातून शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


प्रल्हाद घाडगे हे शांत आणि मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.


या घटनेमुळे महावितरणच्या गलथान कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब आडवे झाले आहेत किंवा तारा लोंबकळत आहेत, तरीही महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याने नाहक नागरिकांना आणि प्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Comments
Add Comment

Pune-Miraj Railway 21 Days Block : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-मिरज मार्गावर २१ दिवसांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

- जाणून घ्या वेळापत्रकातले मोठे बदल पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम आणि नीरा यार्डच्या

Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला धडक; दोन महिलांचा मृत्यू

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात रविवारी एक भीषण अपघात झाला. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या

Satara Suicide : WhatsApp स्टेटसमुळे वाचले महिला पोलिसाचे प्राण; नेमकं काय घडलं?

Rajendra Jain : मंत्री भुजबळांचे आशीर्वाद घेत राजेंद्र जैन यांच्याकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेच्या

KIDNAPPING : विवाहित महिलेशी संभाषणाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

BARAMATI: बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.

Sangli Crime : धक्कादायक! 30 लाखांच्या विम्यासाठी मेहुण्यानेच रचला कट; सांगलीतील खुनाचे गूढ उलगडले

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने परिसरात खळबळ