संजय गायकवाड यांच्यावर आमदार निवास कँन्टीनमध्ये मारहाण केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल

मुंबई: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३५२ अपमानित करणे, ११५(२), मारहाण करणे , ३(५), संगनमत करून मारणे या कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे. समाज माध्यमांमधील व्हिडीओ आणि स्थानिकांकडे केलेल्या चौकशीच्या आधारे अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

"मी कुठलाही मोठा गुन्हा केलेला नाही"- आमदार संजय गायकवाड 


आपल्याला शिळं अन्न दिलं म्हणून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास कँन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्या संबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी जर गुन्हा दाखल झाला तर त्याला सामोरं जाणार असल्याची प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली होती. यादरम्यान त्यांनी मी मी कुठलाही मोठा गुन्हा केलेला नाही, मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली होती, आणि चांगल्या गोष्टीसाठी कितीही माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी 'आय डोन्ट केअर' असं आमदार संजय गायकवाड म्हणाले होते.

दरम्यान संजय गायकवाड यांच्याविरोधात कोण तक्रार करणार याची वाट पाहण्याची पोलिसांना गरज नाही,  पोलिस स्वत: चौकशी करू शकतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण