Nitesh Rane : ‘मुंबईचा डीएनए हिंदूंचा, महानगरपालिकेत फक्त भगवे बसणार…’, नितेश राणे यांचा ठाम विश्वास

मुंबई : नितेश राणे यांच्या हस्ते ‘बोरीवली रो-रो जेट्टी (फेज १)’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन आज सकाळी (११ जुलै) झाले. यावेळी बोलताना भाजप सरकारच्या काळात ज्या घोषणा होतात, ती सर्व कामे पूर्ण होत असल्याचे सांगितले होते. बोरीवली रो-रो प्रकल्पासंदर्भात बोलताना ते म्हणाले, रो रो बोट सेवेत गाड्यांसह प्रवासी प्रवास करू शकतात. यामुळे यापूर्वी ज्या प्रवाशाला एक तास ३० मिनिटे लागत होते ते आता १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन महायुती सरकार काळात झाले होते. आता त्याचे उद्घाटन देखील महायुती सरकारच्या काळात होत आहे.



मुंबईचा डीएनए हिंदूंचा : मंत्री नितेश राणे


मला हिंदूंनी मतदान केले आहे. त्यानंतर मी आमदार झालो. यामुळे मी हिंदूंची बाजू घेतली नाही, तर मी उर्दू लोकांची बाजू घेईन का? गोल टोप्या घातलेल्या आणि दाढी असलेल्या लोकांनी मला मतदान केले नाही. हिंदू म्हणून एकत्र येणे काळाची गरज आहे. मुंबईचा डीएनए हिंदूंचा आहे. मुंबई महानगरपालिकेत फक्त भगवे बसणार आहे, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री व भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे.



तासांचा प्रवास मिनिटांमध्ये होणार


बोरीवली रो-रो प्रकल्पासंदर्भात बोलताना ते म्हणाले, रो रो बोट सेवेत गाड्यांसह प्रवासी प्रवास करू शकतात. यामुळे यापूर्वी ज्या प्रवाशाला एक तास ३० मिनिटे लागत होते ते आता फक्त १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन महायुती सरकार काळात झाले होते. आता त्याचे उद्घाटन देखील महायुती सरकारच्या काळात होत आहे.



संजय राऊत यांना टोला


संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव वाढत असल्याचे म्हटले होते. त्यावर नितेश राणे म्हणाले, मातोश्री किंवा कलानगरची कुठली जनता तर आमच्याबरोबर आहे. महाराष्ट्राच्या जनतेने १० महिने अगोदर आम्हाला निवडून दिले आहे. आम्हाला पाकिस्तानच्या जनतेने निवडून दिले नाही, असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला. भक्तांवर कोण हात उगारत असेल त्यावर कारवाई होईल, मी स्वतः त्यावर माहिती घेईल, असे पंढरपूर येथील सुरक्षारक्षकाने भक्ताला केलेल्या मारहाणीवर राणे यांनी सांगितले.



राज ठाकरेंवर टीका


मराठीवर एवढेच प्रेम आहे तर उद्याची अजान मराठीत सुरू करा. सगळ्या मदर्सातील उर्दू बंद करून तिथे मराठी सक्ती करा. मग आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार आहात, असे नितेश राणे यांनी राज ठाकरे यांना म्हटले आहे. छांगूर बाबा धर्मांतर प्रकरणावर बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, छांगूर बाबाचा निपटारा करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये आमचे योगीजी पुरसे आहेत. त्या बाबाचे महाराष्ट्रात जे चेले असतील, ते आमच्यावर सोडून द्या. त्यांना मिट्टीत मिळवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.

Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर