Bank of Baroda: जगात काही होऊ द्या भारताची अर्थव्यवस्था कणखर !

  81

प्रतिनिधी: भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर भूराजकीय अस्थिरता असूनदेखील सुस्थितीत आहे असे बँक ऑफ बडोदाने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे. सेवा व उत्पादन क्षेत्रातील मोठ्या सुधारणेमुळे ही वाढ झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. पहिल्या तिमाहीतील उपभोगात (Consumption Level) वाढ ही मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) अधिक राहिल्याने ही वाढ झाली असे बँक ऑफ बडोदाने आपल्या अहवालात म्हटले आहे. सरकारने महसूली खर्चात वाढ झाल्यामुळे, स्टीलचा वाढत्या उपभोगामुळे, इलेक्ट्रॉनिक वस्तूतील आयातीमुळे अशा तिहेरी मुद्दांमुळे ही वाढ झाल्याचे अहवालात निरिक्षण नोंदवले गेले.


सेवा क्षेत्रातील (Service Sector) यामध्ये झालेली वाढ, पीएमआय (Purchasing Manager Index PMI) मध्ये वाढलेले आकडे, वाढलेली वाहनांची नोंदणी, डिझेल वापरात झालेली वाढ, राज्यांमध्ये महसूलात झालेल्या वाढीमुळे अशा एकत्रित कारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. या अहवालात आतापर्यंतच्या चांगल्या मान्सूनच्या प्रगतीवरही प्रकाश टाकण्यात आला आहे, ९ जुलैपर्यंतच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा सुमारे १५ टक्के जास्त पाऊस झाला आहे, ज्यामुळे कृषी क्षेत्राला आधार मिळण्याची अपेक्षा आहे.' असे अहवालात निरिक्षण नोंदवले गेले. आर्थिक आघाडीवर अहवालात म्हटले आहे की, 'केंद्र सरकारची आर्थिक स्थिती मजबूत आहे, एप्रिल २०२५ मध्ये ४.६ टक्क्यांच्या तुलनेत मे २०२५ पर्यंत वित्तीय तूट जीडीपीच्या ४.५ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.'


अहवालातील माहितीनुसार, रुपयाचे भविष्यही सकारात्मक आहे. मे महिन्यात १.३ टक्क्यांनी घसरल्यानंतर, जूनमध्ये रुपया ०.२ टक्क्यांनी किंचित कमकुवत झाला आणि महिन्याच्या अखेरीस एका मर्यादित श्रेणीत व्यवहार झाला, ज्यामुळे भू-राजकीय तणाव कमी झाला आणि अमेरिकन डॉलर घसलला होता. 'जुलैमध्ये, अमेरिकन टॅरिफ धोरणांबद्दल चिंता असूनही रुपया वाढीच्या पूर्वाग्रहाने व्यापार करत आहे. १ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी भारत-अमेरिका व्यापार करार वेळेवर पूर्ण होईल अशी गुंतवणूकदारांना आशा असल्याने हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे,' असे अंतिमतः अहवालात म्हटले गेले आहे.

Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना