प्रतिनिधी: भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर भूराजकीय अस्थिरता असूनदेखील सुस्थितीत आहे असे बँक ऑफ बडोदाने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे. सेवा व उत्पादन क्षेत्रातील मोठ्या सुधारणेमुळे ही वाढ झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. पहिल्या तिमाहीतील उपभोगात (Consumption Level) वाढ ही मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) अधिक राहिल्याने ही वाढ झाली असे बँक ऑफ बडोदाने आपल्या अहवालात म्हटले आहे. सरकारने महसूली खर्चात वाढ झाल्यामुळे, स्टीलचा वाढत्या उपभोगामुळे, इलेक्ट्रॉनिक वस्तूतील आयातीमुळे अशा तिहेरी मुद्दांमुळे ही वाढ झाल्याचे अहवालात निरिक्षण नोंदवले गेले.
सेवा क्षेत्रातील (Service Sector) यामध्ये झालेली वाढ, पीएमआय (Purchasing Manager Index PMI) मध्ये वाढलेले आकडे, वाढलेली वाहनांची नोंदणी, डिझेल वापरात झालेली वाढ, राज्यांमध्ये महसूलात झालेल्या वाढीमुळे अशा एकत्रित कारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. या अहवालात आतापर्यंतच्या चांगल्या मान्सूनच्या प्रगतीवरही प्रकाश टाकण्यात आला आहे, ९ जुलैपर्यंतच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा सुमारे १५ टक्के जास्त पाऊस झाला आहे, ज्यामुळे कृषी क्षेत्राला आधार मिळण्याची अपेक्षा आहे.' असे अहवालात निरिक्षण नोंदवले गेले. आर्थिक आघाडीवर अहवालात म्हटले आहे की, 'केंद्र सरकारची आर्थिक स्थिती मजबूत आहे, एप्रिल २०२५ मध्ये ४.६ टक्क्यांच्या तुलनेत मे २०२५ पर्यंत वित्तीय तूट जीडीपीच्या ४.५ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.'
अहवालातील माहितीनुसार, रुपयाचे भविष्यही सकारात्मक आहे. मे महिन्यात १.३ टक्क्यांनी घसरल्यानंतर, जूनमध्ये रुपया ०.२ टक्क्यांनी किंचित कमकुवत झाला आणि महिन्याच्या अखेरीस एका मर्यादित श्रेणीत व्यवहार झाला, ज्यामुळे भू-राजकीय तणाव कमी झाला आणि अमेरिकन डॉलर घसलला होता. 'जुलैमध्ये, अमेरिकन टॅरिफ धोरणांबद्दल चिंता असूनही रुपया वाढीच्या पूर्वाग्रहाने व्यापार करत आहे. १ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी भारत-अमेरिका व्यापार करार वेळेवर पूर्ण होईल अशी गुंतवणूकदारांना आशा असल्याने हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे,' असे अंतिमतः अहवालात म्हटले गेले आहे.