कल्याणमध्ये पसरली डेंग्यू-मलेरियाची साथ

त्वरित उपाययोजना करण्याची मागणी


कल्याण (प्रतिनिधी) : कल्याणमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे. याबाबत मनसेचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल मांची भेट घेतली. शहरात डेंग्यूचे किती रुग्ण आहेत पाचा आकडा केडीएमसीकडे नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. केडीएमसीच्या रुग्णालयांची दयनीय अवस्था आहे. केडीएमसी आयुक्तांनी बाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, आरोग्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी, तर रस्त्यावरील खड्यांसंदर्भातदेखील प्रशासनाने गंभीर लक्ष दिले पाहिजे आदी मागण्या यावेळी आयुक्तांकडे करण्यात आल्या, तर लवकरात लवकर आरोग्य आणि इतर समस्या न सुटल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा प्रकाश भोईर यांनी दिला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, कैलास पनवेलकर, सचिन पोपलाइतकर, रोहन पोवार, कपिल पवार, गणेश लांडगे, रोहन आक्केवार, संदीप पंडित आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


काही दिवसांपासून डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कल्याण पूर्व-पश्चिम मध्ये अनेक गगनचुंबी बांधकामे सुरू आहेत. तेथे बांधकामासाठी ने पाणी साचवले जाते. त्यात डेंग्यूच्या मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असतो. अनेक हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे तसेच मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही नालेसफाई तसेच गटार सफाई झाली नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.


या अशा अनेक कारणांमुळे डेंग्यूचा संसर्ग तसेच मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ नाकारता येत नाही. डेंग्यू संसर्गामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात त्वरित फॉगिंग व कीटकनाशक फवारणी करावी, साचलेल्या पाण्याचे निर्जुतीकरण व नाल्याची साफसफाई तसेच कचऱ्याची विल्हेवाट दररोज करावी. घरोघरी जाऊन डेंग्यू प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. आरोग्य तपासणी शिबिरे व रक्त तपासणी मोफत उपलब्ध करून द्यावी. आवश्यक असल्यास तात्पुरत्या वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्या यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आल्या.

Comments
Add Comment

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य

Fake cotton seeds : खरीपच्या तोंडावर मोठा घोटाळा उघड ! जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Fake cotton seeds : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे.

PM Suryaghar Yojana : सौर ऊर्जेत महाराष्ट्राची दमदार झेप ! पीएम सूर्यघर योजनेत ८ राष्ट्रीय पुरस्कार; जळगाव देशात टॉप-१० मध्ये

PM Suryaghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने (Maharashtra) देशभरात आपली वेगळी छाप उमटवली

Minister Pratap Sarnaik : एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना 'नो एन्ट्री'; मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

- अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्यव्यापी धडक मोहीम मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'एसटी'