नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबर अखेरीस टेक ऑफ,उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिल्या टप्प्याचे उद्द्घाटन येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधानसभेत केली. हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे विमानतळ असून एकाचवेळी ३५० विमाने या विमानतळावर उभी करता येतील एवढी क्षमता याची आहे. तसेच वर्षाला सुमारे ९ कोटी प्रवासी हवाई वाहतुकीचा आनंद यामुळे घेऊ शकतील, अशी माहितीही त्यांनी मावेळी दिली. या विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होत आला असून त्याचे उ‌द्घाटन सप्टेंबरअखेरीस केले जाणार आहे.

नवी मुंबई विमानतळ नेमके कधी सुरू होणार? याबद्दल प्रश्न विचारले जात होते. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली की, येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नवी मुंबई विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होणार होता. बहुतांश कामे पूर्ण झाली असून किरकोळ कामे येत्या दोन महिन्यात अंतिम केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर २०२९ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा २०३२ पर्यंत आणि चौथा टप्पा २०३६ पर्यंत पूर्ण होईल, असे बोलले जात आहे.

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ महाराष्ट्रात उभारले जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दुसऱ्या क्रमांकांचे विमानतळ उभारले जात आहे. नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने बोडले जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. तसंच, नवी मुंबईच्या विमानतळाला मेट्रो, लोकल, बस आणि खासगी वाहनांसोबत जोडण्यात येईल.
Comments
Add Comment

Mumbai : मुंबईत झाडांच्या फांद्यांची होणार शास्त्रोक्त छाटणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धोकेदायक ठरू शकणाऱ्या झाडांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी शास्रोक्त पद्धतीने छाटणी कशी

BMC CBSE 10th Class Result : महानगरपालिका सीबीएसई मंडळाच्या दहावीचा निकाल ९२.८९ टक्के

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमांकनाचा तीढा सुटणार

 उच्चस्तरीय समिती गठीत; बाह्य सीमा निश्चित करून सरकारला शिफारशी करणार मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या

Adv. Ashish Shelar : आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा - माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

 क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे मुंबई : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2023

BMC : मुंबई महापालिका प्रशासनात खांदेपालट, सहायक आयुक्तांना पदोन्नती तर काहींच्या बदल्या

सहायक आयुक्त योगेश देसाईंवर जी उत्तर विभागाची जबाबदारी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासनात

Marketing Minister Jaykumar Rawal : शालेय अभ्यासक्रमात ‘सहकार’ विषयाचा समावेश होणार

नव्या सहकार धोरणासाठी उच्चस्तरीय समितीची बैठक; आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘ब्रँडिंग’वर विशेष भर देणार मुंबई :