महिला मतदारांनी लेखी निवेदन दिल्यास 'दारूबंदी'

  44


खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई : खारघर परिसरात प्रभागाकरिता दारूबंदी करण्याबाबत विहित प्रक्रियेनुसार निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


खारघर परिसरातील दारू विक्री परवाना रद्द करून दारूमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार विधानसभेत बोलत होते.


सन २००८ व २००९ च्या अधिसूचनेनुसार नगरपरिषद/महानगरपालिका क्षेत्रातील एखाद्या प्रभागातील २५ टक्के पेक्षा कमी नसलेल्या महिला मतदार किंवा एकूण मतदारांनी लेखी निवेदन दिल्यास संबंधित जिल्हाधिकारी यथास्थिती गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. जर संबंधित प्रभागातील एकूण मतदार किंवा महिला मतदारांच्या संख्येच्या किमान ५० टक्केपेक्षा अधिक अनुक्रमे एकूण मतदार किंवा महिला मतदार यांनी मद्य विक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्याच्या बाजूने मतदान केल्यास त्या क्षेत्रात मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येतात, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.


उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत किंवा महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर अनुज्ञप्ती संदर्भात कोणती कार्यवाही करावी यासंदर्भात शासनाने वेळोवेळी नियमांमध्ये बदल केले आहेत. १९७२ पासून राज्यात नवीन अनुज्ञप्तीची परवानगी देण्यात येत नाही. तथापि, विहित कार्यपद्धतीनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यास परवानगी देण्यात येते.


मद्य विक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्यासंदर्भात नगरपालिका किंवा महानगरपालिकेतील उपस्थित नागरिकांच्या नव्हे तर एकूण मतदारांच्या ५० टक्के पेक्षा अधिक अनुक्रमे एकूण मतदार किंवा महिला मतदारांचा निर्णय विचारात घेतला जाईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यास उत्तर देताना स्पष्ट केले.


Comments
Add Comment

Pratap Sarnaik: "मी मंत्री, आमदार नंतर... मराठी आधी!" प्रताप सरनाईक यांची ठाम भूमिका

मीरा-भाईंदर: मराठी एकीकरण समितीच्या वतीने मिरा रोड येथे आज मराठी अस्मिता, स्थानिक भाषिकांचे अधिकार आणि न्याय

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि ठाकरेंचे राजकारण!

मुंबई : तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. त्यांच्या 'आवाज मराठीचा' मेळाव्याने

Mangalprabhat Lodha : आदित्य ठाकरेंकडून रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न का? मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा रोखठोक सवाल

कुर्ला आयटीआय परिसरात पारंपरिक खेळाचे मैदान उभे राहणार : मंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई : कुर्ल्यातील महाराणा

Devendra Fadanvis : सरन्यायाधीश भूषण गवईंचा हा सत्कार फक्त विधीमंडळाकडून नव्हे तर १३ कोटी जनतेकडून – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : आज महाराष्ट्र विधीमंडळात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी

मनसेच्या मोर्चात मंत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न, मराठी मोर्चात नेमकं काय घडलं?

मुंबई: मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यावसायिकांनी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर

Doctor Suicide: अटल सेतूवरून जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरची खाडीत उडी; शोधकार्य सुरू

नवी मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू पुलावरून जे.जे. रुग्णालयातील एका डॉक्टरने खाडीत उडी