अमेरिकेत फिरायला गेलेल्या हैदराबादमधील एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू


वॉशिंग्टन : अमेरिकेत फिरायला गेलेल्या एका हैदराबादी कुटुंबातील आई-वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना अमेरिकेतील ग्रीन काउंटीवरून डलासकडे परत येत असताना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील वेंकट आणि तेजस्विनी आपल्या दोन मुलांसह अमेरिकेत फिरायला गेले होते. यादरम्यान, एका ट्रकने या कुटुंबाच्या कारला जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, कारने लगेचच पेट घेतला. यामुळे चौघांचाही होरपळून जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी मृतदेह फॉरेंसिक तपासणीसाठी पाठवले आहेत. डीएनए चाचणीच्या आधारे मृतांची ओळख पटवून नातेवाईकांना मृतदेह सोपवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, मृतदेह लवकरच भारतात आणले जातील.


या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे.


Comments
Add Comment

आधार कार्ड संदर्भात ५ नवीन नियम लागू! तुमचे कार्ड लगेच तपासा

१० वर्षांवरील आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य; वडिल-पतीचे नाव हटवले, 'बायोमेट्रिक' अपडेटसाठी शुल्क वाढले मुंबई:

चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना; ९ कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईजवळील उत्तर चेन्नई औष्णिक वीज केंद्राच्या बांधकाम ठिकाणी आज एक भीषण

'ड्रायव्हरलेस' रिक्षा भारतात दाखल! या रिक्षाची किंमत किती आणि कुठे चालणार ही रिक्षा, पहा..

मुंबई: भारतीय वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकत ओमेगा सेकी मोबिलिटीने (OSM) जगातील पहिली चालकरहित

भारतामधून कोणत्या शेजारील देशांमध्ये रेल्वे धावते? प्रवासासाठी 'हे' पुरावे आवश्यक

नवी दिल्ली: भारतामधून काही शेजारील देशांमध्ये रेल्वेने प्रवास करणे शक्य आहे, ज्यामुळे ग्रामीण सौंदर्याचा

VK Karur Stampede : विजय थलापतीला अटक होणार? करूर चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीके जिल्हा सचिवांना बेड्या; पोलिसांची मोठी कारवाई

करूर : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापती एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'अमेरिकेच्या दबावापोटी यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली'

नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या मोठ्या प्रमाणात