'अमेरिकेच्या दबावापोटी यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली'


नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. मृतांमध्ये भारतीय नागरिकांसह काही परदेशी नागरिकांचाही समावेश होता. हा हल्ला करणारे दहा पैकी नऊ दहशतवादी सुरक्षा पथकांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले. अजमल कसाब नावाच्या एका दहशतवाद्याला मुंबई पोलिसांनी जीवंत पकडले. कसाबने दिलेल्या माहितीमुळे हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे ठोस पुरावे तपास पथकाला मिळाले. यानंतर पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. पण अमेरिकेच्या प्रचंड दबावापोटी तत्कालीन यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली. हा धक्कादायक गौप्यस्फोट देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केला.


हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण होण्याच्या सुमारास पी. चिदंबरम यांनी अमेरिकेच्या दबावामुळेच यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधातील कारवाई टाळल्याचे सांगितले. एका मुलाखतीत दरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पी. चिदंबरम यांनी गौप्यस्फोट केला. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला. या घटनेनंतर काही दिवसांनी पी. चिदंबरम यांनी देशाच्या गृहमंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यानंतर काही दिवसांतच मेरिकेच्या तत्कालिन परराष्ट्रमंत्री काँडोलिसा राईस भारतात आल्या होत्या. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि माझी भेट घेतली, असे पी. चिदंबरम यांनी सांगितले.


राईस यांनी भारताने पाकिस्तानवर कोणतीही लष्करी कारवाई करू नये असे सांगितले. या नंतर काँडोलिसा राईस भारतात आणखी काही जणांना भेटून गेल्या. पुढे भारताने पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई टाळली, असे पी. चिदंबरम म्हणाले. भाजपने पी. चिदंबरम यांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. पी. चिदंबरम जे काही बोलले ते खूप उशिरा बोलले, या शब्दात भाजपने प्रतिक्रिया दिली.


Comments
Add Comment

House Aesthetic : कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लूक!

कमी बजेटमध्ये घर सजवायचंय? https://prahaar.in/2026/07/11/upvas-food-bored-of-sabudana-khichdi-during-fasting-then-definitely-try-this-delicious-and-healthy-dishes/ या सोप्या (Simple)

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत

PM Narendra Modi : 'ही घटना अत्यंत दुःखद...' व्हिएतनाम बोट दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला तीव्र शोक

व्हिएतनाम : व्हिएतनाममधील 'फू क्वोक' बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची हृदयद्रावक घटना समोर