'अखेर सरकारने मोर्चाला परवानगी दिली'

मुंबई : मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी मनसे मोर्चा काढत आहे. या मोर्चाला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम होते. हे बघून घाबरून पोलिसांनी मोर्चाला परवनगी दिली, असे मनसेचे अभिजीत पानसे यांनी सांगितले.

आधी व्यापाऱ्यांचा मोर्चा, आता मनसेचा मोर्चा

ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथे व्यवस्थित मराठी बोलू न शकणाऱ्या काही व्यापाऱ्यांना मारहाण झाली. या घटनेचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांना मोर्चा काढला. नंतर मनसेने मीरा-भाईंदर शहरात मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्याची घोषणा केली. पण या मोर्चासाठी गर्दीच्या भागातील मार्गाची मागणी केली. गर्दीच्या वेळेत मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली तर नागरिकांची गैरसोय होईल त्यामुळे दुसरा एखादा मार्ग सांगा अशी तोंडी विनंती पोलिसांनी केली. पण मनसेचे पदाधिकारी मोर्चा मार्गावर अडून बसले.अखेर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. पोलिसांचा निर्णय आला आणि मीरा भाईंदरमध्ये तणाव वाढण्यास सुरुवात झाली.

आधी पोलीस कारवाई, नंतर मोर्चाला परवानगी

मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई सुरू असल्याचे सांगत पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मनसेच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मनसेशी संबंधित असलेल्या अनेकांना नोटीस बजावण्यात आली. मीरा भाईंदर तसेच वसई विरारमध्ये मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांनी स्थानिक पोलिसांशी चर्चा करुन नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल असा मार्ग मोर्चा काढण्यासाठी निवडावा. जर तोडगा निघाला तर मोर्चासाठी लगेच परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर थोड्याच वेळात पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली आहे, असे मनसेचे अभिजीत पानसे यांनी सांगितले.

मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी मनसे मोर्चा काढत आहे. या मोर्चाला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम होते. हे बघून घाबरून पोलिसांनी मोर्चाला परवनगी दिली, असेही मनसेचे अभिजीत पानसे म्हणाले.
Comments
Add Comment

Gold Silver Price Hike : एका झटक्यात बदलले सोन्या-चांदीचे भाव; केंद्र सरकारचा रात्रीत मोठा निर्णय; ग्राहकांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली : जर तुम्ही येत्या काही दिवसांत लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी

Bhiwandi Water Cut : भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा! शहरात उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा बंद; 'या' भागात होणार परिणाम

ठाणे : भिवंडी शहराला पाणीपुरवठा (Bhiwandi Water Cut) करणाऱ्या यंत्रणेमध्ये तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Hingoli : जमिनीतून गूढ आवाज अन् ३.४ रिश्टर स्केलचे हादरे; हिंगोली पुन्हा हादरलं!

हिंगोली : गेल्या काही काळापासून महाराष्ट्रभरात भूगर्भातून येणाऱ्या आवाजांचे सत्र सुरूच आहे. आता हिंगोली

Mumbai Crime News : भायखळ्यात गोळीबार, 'डी-कंपनी' कनेक्शनमुळे पोलीस यंत्रणा सतर्क; हल्लेखोर पसार

मुंबई : मुंबईतील गजबजलेल्या भायखळा (Byculla News) परिसरात काल एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. अज्ञात

SRHvsGT : हैदराबादला चिरडत गुजरात अव्वल स्थानी, गोलंदाजांच्या बळावर सलग पाचवा विजय

अहमदाबाद : विजयासाठी २० षटकांमध्ये अवघ्या १६९ धावा करण्याचे आव्हान सनरायर्झस हैदराबादला पेलवले नाही. १४. ५

Sangli : सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू

सांगली : जत तालुक्यात मोटेवाडी येथील मरगुबाई मंदिराची भिंत कोसळून सोमवारी दोन मुलांसह सहाजणांचा मृत्यू झाला.