महाराष्ट्राने अमूल, मदर डेअरी प्रमाणे दुधाचा ब्रँड निर्माण करावा – राज्यपाल

  70

मुंबई : दुधाच्या उत्पादनात सहकाराच्या माध्यमातून ज्याप्रमाणे गुजरात राज्याने ‘अमूल’, दिल्लीने ‘मदर डेअरी’ व कर्नाटकने ‘नंदिनी’ ब्रँड तयार केला त्याप्रमाणे महाराष्ट्राने सहकार संस्थांच्या माध्यमातून दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करावा, अशी सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ तसेच केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे राजभवन येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहकार आयुक्त दीपक तावरे, सहकार विभागातील सहसचिव संतोष पाटील यांसह सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सन २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करायचा असेल तर विकास सर्वसामायिक झाला पाहिजे असे सांगून सहकार यशस्वी झाले तरच विकास सर्वसमावेशक होईल. सहकार चळवळीतून नेतृत्व तयार झाले पाहिजे. सहकार चळवळीने महाराष्ट्राला प्रगल्भ राजकीय नेतृत्व दिले आहे. ‘मी’ पणाने सहकार क्षेत्राचा विस्तार होत नाही, तर सहकार क्षेत्रासाठी ‘आम्ही’ ही संघभावना ठेवून काम केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

सहकार क्षेत्रात अभ्यासू व प्रशिक्षित लोक येणे आवश्यक आहे. या दृष्टीने राज्यातील ज्या क्षेत्रात सहकार चळवळ सशक्त आहे, त्या परिसरातील विद्यापीठामध्ये सहकार विषयक पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी पालघर जिल्ह्यातील ११२ वर्षे जुन्या माहीम सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला, तर ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे वृक्षारोपण करण्यात आले.
Comments
Add Comment

राज ठाकरेच्या घरच्या गणपतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले दर्शन, शिवतीर्थवर काय झाली चर्चा?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून, सकाळपासून अनेक राजकीय लोकांची वर्दळ

वसई इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला! ७ जणांचा मृत्यू तर ९ जखमी

पालघर: वसई तालुक्यातील नारंगी रोड वरील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत लगतच्या चाळीवर कोसळल्यामुळे आज

मुंबईतील 'हे' १२ पूल गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी धोकादायक! BMC चा निर्वाणीचा इशारा

१२ पुलांवरून श्रीगणेश मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन मुंबई : बृहन्मुंबई

अखेर मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी मिळाली, पण...

आझाद मैदानावर मराठा आंदोलनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एका दिवसाची परवानगी दिली मुंबई: मराठा आरक्षणाच्या

जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा मुंबईच्या दिशेने रवाना, कुठून कसे येणार? जाणून घ्या सविस्तर-

मुंबई: गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटत नसल्याकारणामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या

मुंबईकरांना दिलासा: गणेशोत्सवात 'एलिफस्टन पूल' सुरू राहणार; अनंत चतुर्दशीनंतर होणार पाडकाम

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील