काँग्रेसचा माजी आमदार भाजपाच्या वाटेवर! राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली

  35

सोलापूर : पंढरपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार‌ तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्यात काही मिनिटे संवाद झाला. या भेटीची सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली असून त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपाच्या वाटेवर चालले असल्याची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली आहे.


सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार माने आणि सुरेश हसापुरे यांच्याशी हातमिळवणी करून पॅनेल उभे केले होते. या निवडणुकीचे सर्व अधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांनी कल्याणशेट्टींना दिल्याचे त्यावेळी सांगितले गेले. पण, जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ आमदार नाराज झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस हे पांडुरंगाची शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरपूरला गेले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दोन्ही देशमुख हजर होते.

Comments
Add Comment

Suspicious Boat: रायगड किनाऱ्यावर आली संशयास्पद बोट, सुरक्षा वाढवली

प्राथमिक तपासात दुसऱ्या देशाची बोट रायगड किनाऱ्यावर वाहून आल्याचा संशय रायगड: रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर एक

मनसे पदाधिकाऱ्याचा मुंबईत दारू पिऊन अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा, मराठी इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ

मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल

अंगणवाडी घोटाळा विधानसभेत गाजला: मृत मदतनिसाच्या नावाने पगार लाटला, मंत्र्यांना कारवाईस भाग पाडले!

मुंबई: अक्कलकुवा तालुक्यातील एका धक्कादायक अंगणवाडी घोटाळ्याचा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. मृत

मंत्रालयात आदिवासींच्या जागा बिगर-आदिवासींनी बळकावल्याचा आरोप; विधानसभेत गदारोळ!

मुंबई: मंत्रालयातील विविध विभागांमध्ये आदिवासींसाठी राखीव असलेल्या अनेक जागा बिगर-आदिवासी कर्मचाऱ्यांनी

संपत्तीचे केंद्रीकरण धोकादायक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली चिंता नागपूर : संपत्तीचे केंद्रीकरण धोकादायक असून

पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट ! पालघर जिल्ह्यात आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील काही भागांत पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा