ठाकरेंसोबत युती केल्यानं काँग्रेसचं मोठं नुकसान! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका

नागपूर : उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आज (सोमवार, ७ जुलै) रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.


काँग्रेसची स्थिती फार वाईट


मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला नेहमीच अपमानित केले आहे. त्यामुळे अजून किती अपमानित व्हायचे ते काँग्रेस पक्षाने ठरवायचे आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतू, उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. उद्धवजींनी जिद्द करून काँग्रेसच्या जागा घेतल्या आणि काँग्रेसला कमी केले. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचा नाकर्तेपणा काँग्रेसच्या अंगावर आला. ठाकरे सरकारची अँटी इनकंबन्सी काँग्रेसवर आली. त्यावेळी काँग्रेसचे नेते हतबल होते. त्यामुळे आता काँग्रेसची स्थिती फार वाईट आहे," असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान

महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च

महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीला राड्यांचे ग्रहण

मुंबई : महाराष्ट्रातील २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवार २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले. मतदानाची वेळ

महाराष्ट्रात किती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती अखेर आकडा समोर, निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या