भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका पुढे ढकलली
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. तिथे भारत आणि बांगलादेश यांच्यात ऑगस्ट २०२५ मध्ये तीन एकदिवसीय सामने आणि दोन टी २० सामने होणार होते. पण हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड नव्याने चर्चा करणार आहे. स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक निश्चित झाल्यावर जाहीर केले जाईल. क्रिकेटचा सध्याचा कार्यक्रम बघता सप्टेंबर २०२६ पर्यंत भारत - बांगलादेश दरम्यान मालिका होण्याची शक्यता कमी आहे.
बांगलादेशमध्ये सध्या निवडून आलेले सरकार नाही. अंतरिम प्रमुख मुहम्मद युनूस देश सांभाळत आहेत. त्यांनी पुढील वर्षीपर्यंत निवडणुका होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. बांगलादेशमध्ये हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवरील हल्ले आणि अत्याचार यात वाढ होत आहे. यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बीसीसीआयने दौरा पुढे ढकलला आहे.