पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट!

सात तालुक्यांत मुसळधार पाऊस


पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये वसई वगळता इतर सात तालुक्यांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पावसाने चांगलच जोर धरला आहे . मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रादेशिक हवामान विभागाने शनिवार व रविवारी पालघर जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाची बॅटिंग सुरू आहे.


आठवडा भराच्या विश्रांतीनंतर शुक्रवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वसई तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. रविवारी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वत्र जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी विशेषतः या दोन दिवसांमध्ये घराबाहेर न पडण्याचे आणि आवश्यक असल्यास बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.


अनेक प्रमुख रस्त्यांवरून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अर्ध्याहून अधिक नाले तुडुंब भरले असून, काही ठिकाणी नाले ओसंडून वाहत आहेत. विशेष म्हणजे, रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांमुळे ठिकठिकाणी पडलेले खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


एकीकडे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, "विकेंड" असल्याने अनेक पर्यटकांनी धबधब्यांकडे आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा बेत आखला आहे. मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच बहरले असल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह ठिकठिकाणी दिसून येत आहे. नदीकिनारी, धबधब्यांच्या जवळ आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.

Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता