पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट!

सात तालुक्यांत मुसळधार पाऊस


पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये वसई वगळता इतर सात तालुक्यांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पावसाने चांगलच जोर धरला आहे . मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रादेशिक हवामान विभागाने शनिवार व रविवारी पालघर जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाची बॅटिंग सुरू आहे.


आठवडा भराच्या विश्रांतीनंतर शुक्रवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वसई तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. रविवारी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वत्र जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी विशेषतः या दोन दिवसांमध्ये घराबाहेर न पडण्याचे आणि आवश्यक असल्यास बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.


अनेक प्रमुख रस्त्यांवरून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अर्ध्याहून अधिक नाले तुडुंब भरले असून, काही ठिकाणी नाले ओसंडून वाहत आहेत. विशेष म्हणजे, रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांमुळे ठिकठिकाणी पडलेले खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


एकीकडे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, "विकेंड" असल्याने अनेक पर्यटकांनी धबधब्यांकडे आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा बेत आखला आहे. मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच बहरले असल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह ठिकठिकाणी दिसून येत आहे. नदीकिनारी, धबधब्यांच्या जवळ आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.

Comments
Add Comment

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,

'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा

वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना

खाजगीकरणा विरोधात वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने; ९ ऑक्टोबरला संपाचा इशारा

पालघर : वीज कंपन्यांमधील खाजगीकरण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि

Vasai Factory Fire: वसईत कारखान्याला भीषण आग

वसई: वसईत तुंगारेश्वर फाटा येथील पुठ्ठा कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कारखान्यातील अनेक