हे तांदूळ खा , फिटनेस जपा !

  108

मुंबई : आपल्या देशात अनेक प्रकारचा तांदुळ पिकवतात . भारतीय आहारात भाताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, आधुनिक काळात केवळ पांढऱ्या भातावर अवलंबून राहण्याऐवजी पोषणमूल्यांनी समृद्ध इतर प्रकारांचा विचार करणे आवश्यक आहे. आज आपण अशाच आरोग्यदायी व पारंपरिक भातप्रकारांची माहिती घेणार आहोत, जे तुमच्या आहाराला अधिक समृद्ध करू शकतात. हे भातप्रकार आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केल्यास पचन सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि संपूर्ण पोषण मिळते.


पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो . तो जवळपास ७० ते ९० च्या आसपास असतो. यात पोषक तत्वेही कमी असतात आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. त्यामुळे पांढरा तांदुळ खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. लठ्ठपणा वाढल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. जे आधीपासून मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी तर पांढरा तांदुळ खाऊच नये असा सल्ला दिला जातो.



जाणून घ्या कोणते आहेत हे तांदळाचे प्रकार : 


ब्राउन राईस
या तांदळात फायबरचे प्रमाण जास्त आहे . वजन कमी करणाऱ्यांसाठी आणि मधुमेहींसाठी विशेष फायदेशीर आहे .


सालाम राईस
दक्षिण भारतातील लांबट दाण्याचा भात. सौम्य चव आणि हलकं पचन यामुळे दररोजच्या आहारासाठी योग्य .


ब्लॅक राईस
काळसर रंगाचा हा भात अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असतो. वजन कमी करणे, मधुमेह नियंत्रित करणे असे गुणधर्म यात आहेत .


रेड राईस
फायबरयुक्त, खनिजांमध्ये भरपूर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त. केरळ, कर्नाटकात याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.


नवारा राईस
आयुर्वेदात याला औषधी मानले जाते. हा तांदूळ खाल्ल्याने पचन सुधारते , रोगप्रतिकारक शक्ती वाढते , विशेषतः रुग्ण व वृद्ध व्यक्तींना उपयुक्त.


काळा जीरा राईस
सुगंधी, लांबसर दाणे असलेला हा भात सौम्य चवीचा असतो. बासमतीसारखा दिसतो पण पचनास अधिक हलका आहे .


Comments
Add Comment

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत

Oral Health Cancer Risk: योग्यरित्या ब्रश न केल्यास कर्करोगाचा धोका! दिल्ली AIMS संशोधनात दावा

नवी दिल्ली: एम्स दिल्ली येथील संशोधकांनी अलिकडेच केलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की जर तुम्ही तुमच्या