देहरजे नदीवरील पुरात अडकलेल्या मुलाला वाचवण्यात यश

शीळ, देहर्जे गावातील नागरिकांची घटनास्थळी धाव


विक्रमगड : देहर्जे-शीळ गावाला जोडणाऱ्या देहरजे नदीवरील पुल पार करतांना पांडुरंग मेरे रा. हातणे या नागरिकांला पाण्याचा अंदाज न आल्याने व पुलावर गेल्यावर अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने. हा नागरिक पुराच्या पाण्यात पुलावर अडकला होता. प्रशासनाच्या व नागरिकांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.


पांडुरंग मेरे, रा. हातणे हा आज सकाळी ९.३० च्या सुमारास देहर्जे गावातून शीळकडे जात असताना देहरजे नदीवरील पूल पार करताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पाण्याच्या पातळी वाढल्याने पुलाच्या मधोमध अडकला होता. या बाबतची माहिती मिळताच विक्रमगड तहसीलदार मयूर चव्हाण व प्रशासन, शीळ, देहर्जे गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.


तत्काळ दोराच्या सहाय्याने या नागरिकांला पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
सुदैवाने या नागरिकांला कोणतेही गंभीर दुःखापत झाली नसून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. यासाठी शीळ व देहर्जे गावातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. पूर परिस्थिती नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Palghar Accident : शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

पालघर:  पालघर जिल्ह्यातील शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर एक भीषण अपघात (Accident) घडला. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. या

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या