आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम


पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या पवित्र भूमीत पायी चालत येतात. या पवित्र यात्रेत भक्तीचा गजर आणि विठ्ठलनामाचा जप तर आहेच, पण यंदा सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेने या वारीला एक नवे परिमाण जोडले आहे.


सुमित ग्रुपच्या हजारो स्वयंसेवकांनी आषाढी वारी आणि परतवारीच्या मार्गावर स्वच्छतेचा संदेश देत, परिसराला निर्मळ आणि पवित्र ठेवण्याचा संकल्प पूर्ण केला.या स्वच्छता मोहिमेची संकल्पना आणि दिग्दर्शन सुमित पाटील यांनी केले असून, पराग सावंत, राहुल पारकर आणि चिन्मय परब यांनी या कार्याचे छायाचित्रण, निखिल पालंडे यांचे लेखन, सौरभ नाईक यांचे संकलन, रविराज कोलथरकर यांनी संगीत तर अभिनेते उदय सबनीस यांचा आवाज असून या अनोख्या उपक्रमाला चित्ररूप दिले आहे.




सुमित ग्रुपच्या स्वयंसेवकांनी वारीच्या मार्गावर आणि पंढरपूर परिसरात अथक परिश्रम करत रस्ते स्वच्छ केले. या मोहिमेचा एक खास व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्वच्छतेच्या दूतांनी भक्ती आणि कर्तव्याचा संगम कसा घडवला, याचे सुंदर दर्शन घडते.


वारीदरम्यान चंद्रभागेच्या काठावर लाखो भाविकांचा मेळा जमतो. विठ्ठलाच्या दर्शनाने मन प्रसन्न होते, पण परिसरातील अस्वच्छता अनेकांना खटकते. याच आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सुमित ग्रुपचे स्वयंसेवक 'माऊलीच्या लेकरां'प्रमाणे कार्यरत झाले. त्यांनी निस्वार्थ भावनेने स्वच्छतेचे कर्तव्य निभावले आणि परतवारीच्या पावित्र्याला जपले. या स्वयंसेवकांचे कार्य पाहून अनेक वारकऱ्यांच्या मनात स्वच्छतेच्या प्रति जागरूकता निर्माण झाली. विठ्ठल माऊली केवळ विटेवर नाही, तर या स्वच्छता दूतांच्या रूपात भक्तांमध्ये वावरत असल्याची अनुभूती अनेकांना झाली.या मोहिमेच्या माध्यमातून सुमित ग्रुपने केवळ परिसर स्वच्छ केला नाही, तर भक्तीच्या प्रवाहात स्वच्छतेचे धागे विणले.



"वारी ही केवळ भक्तीचा उत्सव नाही, तर कर्तव्य आणि जबाबदारीचा संगम आहे," असे सुमित पाटील यांनी सांगितले. श्रीरंग ट्रस्टने या मोहिमेच्या प्रत्येक क्षणाला आपल्या कॅमेऱ्यात टिपत, स्वच्छतेच्या या संदेशाला व्यापक स्वरूप दिले.आषाढी वारीच्या या पवित्र प्रवासात सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विठ्ठलाच्या भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश यांचा हा संगम प्रत्येक वारकऱ्याच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील