आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम


पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या पवित्र भूमीत पायी चालत येतात. या पवित्र यात्रेत भक्तीचा गजर आणि विठ्ठलनामाचा जप तर आहेच, पण यंदा सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेने या वारीला एक नवे परिमाण जोडले आहे.


सुमित ग्रुपच्या हजारो स्वयंसेवकांनी आषाढी वारी आणि परतवारीच्या मार्गावर स्वच्छतेचा संदेश देत, परिसराला निर्मळ आणि पवित्र ठेवण्याचा संकल्प पूर्ण केला.या स्वच्छता मोहिमेची संकल्पना आणि दिग्दर्शन सुमित पाटील यांनी केले असून, पराग सावंत, राहुल पारकर आणि चिन्मय परब यांनी या कार्याचे छायाचित्रण, निखिल पालंडे यांचे लेखन, सौरभ नाईक यांचे संकलन, रविराज कोलथरकर यांनी संगीत तर अभिनेते उदय सबनीस यांचा आवाज असून या अनोख्या उपक्रमाला चित्ररूप दिले आहे.




सुमित ग्रुपच्या स्वयंसेवकांनी वारीच्या मार्गावर आणि पंढरपूर परिसरात अथक परिश्रम करत रस्ते स्वच्छ केले. या मोहिमेचा एक खास व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्वच्छतेच्या दूतांनी भक्ती आणि कर्तव्याचा संगम कसा घडवला, याचे सुंदर दर्शन घडते.


वारीदरम्यान चंद्रभागेच्या काठावर लाखो भाविकांचा मेळा जमतो. विठ्ठलाच्या दर्शनाने मन प्रसन्न होते, पण परिसरातील अस्वच्छता अनेकांना खटकते. याच आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सुमित ग्रुपचे स्वयंसेवक 'माऊलीच्या लेकरां'प्रमाणे कार्यरत झाले. त्यांनी निस्वार्थ भावनेने स्वच्छतेचे कर्तव्य निभावले आणि परतवारीच्या पावित्र्याला जपले. या स्वयंसेवकांचे कार्य पाहून अनेक वारकऱ्यांच्या मनात स्वच्छतेच्या प्रति जागरूकता निर्माण झाली. विठ्ठल माऊली केवळ विटेवर नाही, तर या स्वच्छता दूतांच्या रूपात भक्तांमध्ये वावरत असल्याची अनुभूती अनेकांना झाली.या मोहिमेच्या माध्यमातून सुमित ग्रुपने केवळ परिसर स्वच्छ केला नाही, तर भक्तीच्या प्रवाहात स्वच्छतेचे धागे विणले.



"वारी ही केवळ भक्तीचा उत्सव नाही, तर कर्तव्य आणि जबाबदारीचा संगम आहे," असे सुमित पाटील यांनी सांगितले. श्रीरंग ट्रस्टने या मोहिमेच्या प्रत्येक क्षणाला आपल्या कॅमेऱ्यात टिपत, स्वच्छतेच्या या संदेशाला व्यापक स्वरूप दिले.आषाढी वारीच्या या पवित्र प्रवासात सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विठ्ठलाच्या भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश यांचा हा संगम प्रत्येक वारकऱ्याच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.

Comments
Add Comment

Pune-Miraj Railway 21 Days Block : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-मिरज मार्गावर २१ दिवसांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

- जाणून घ्या वेळापत्रकातले मोठे बदल पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम आणि नीरा यार्डच्या

Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला धडक; दोन महिलांचा मृत्यू

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात रविवारी एक भीषण अपघात झाला. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या

Satara Suicide : WhatsApp स्टेटसमुळे वाचले महिला पोलिसाचे प्राण; नेमकं काय घडलं?

Rajendra Jain : मंत्री भुजबळांचे आशीर्वाद घेत राजेंद्र जैन यांच्याकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेच्या

KIDNAPPING : विवाहित महिलेशी संभाषणाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

BARAMATI: बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.

Sangli Crime : धक्कादायक! 30 लाखांच्या विम्यासाठी मेहुण्यानेच रचला कट; सांगलीतील खुनाचे गूढ उलगडले

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने परिसरात खळबळ