संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

  30

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका


मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका राज्यभरातील अनेक शाळांना बसला असून राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून त्याचा फटका कोकणातील ९९ शाळांनाही बसणार आहे. यावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्वंकष निर्णय घेण्यासाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आमदारांबरोबर तसेच ज्या विभागातील आमदारांच्या शाळांना फटका बसला आहे त्या आमदारांसहित बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिले.


राज्यात संचमान्यतेनुसार जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक आणि मुख्याध्यापकांची पदे निश्चित होतात. त्यानुसार २०२४-२५ या वर्षांच्या संच मान्यतेचे निकष शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना फायदा होण्याऐवजी तोटाच सहन करावा. पुणे विभागातील माध्यमिक शाळेतील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप शालार्थ आयडी मिळालेले नाहीत. अनुदानित माध्यमिक शाळांपैकी ८८४ शाळांना २०२४-२५ च्या संचमान्यतेमध्ये एकही शिक्षकांचे पद मंजूर करण्यात आलेले नाही, असे जयंत आसगावकर यांनी परिषदेच्या निदर्शनाला आणून दिले. चर्चेत ज. मो. अभ्यंकर, भाई जगताप, परिणय फुके, प्रवीण दरेकर, ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह अनेक सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. राज्यात शालांत परीक्षेत कित्येक वर्षे कोकणातील शाळांचा रिझल्ट पहिल्या श्रेणीचा लागत आहे. मात्र संच मान्यतेमुळे कोकणातील शाळांचे आणि मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सुमारे ९९ शाळांना फटका बसला आहे. त्यामुळे संच मान्यतेत दुरुस्ती होणे आवश्यक आहे, अशी माहिती निरंजन डावखरे यांनी दिली. संचमान्यतेत अनेक त्रुटी असून त्या सुधारण्याच्या दृष्टीने जीआरमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. हा राज्यव्यापी प्रश्न असल्याने आपणा सर्वांबरोबर एक बैठक घेऊन त्यात अधिकच्या सुधारणा करण्यात येतील, असे भोयर म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबईत आता दर १०० मीटर अंतरावर बसवल्या जाणार कचरापेट्या

मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांसाठी कचरा उचलण्यासाठी मोठ्या आणि छोट्या कॉम्पॅक्टरसह

मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य व हार्बर मार्गावर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा ५० टक्के

जुलैच्या पहिल्याच आठवड्यातील पावसाने साधली किमया मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

मालवाहतूकदार संघटनांच्या आजच्या बैठकीत ठरणार संपाची दिशा

बचाव कृती समितीमधून संघटनांच्या माघारीस सुरुवात मुंबई : राज्यातील अवजड वाहने, मालवाहतूकदार संघटनांनी संप सुरू

स्थानिक स्वराज्य संस्थांना 'एक टक्के' नोंदणी निधी थेट हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव!

प्रक्रिया अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार, महसूलमंत्र्यांची विधानसभेत

बोरिवली येथील खादी ग्रामोद्योग ट्रस्टला जमीन हस्तांतरण कायदेशीर

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानसभेत स्पष्टीकरण मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी