शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू

बाराबंकी : शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे घडली. सातवीत शिकत असलेला मुलगा वडिलांसोबत कारमधून शाळेत आला. शाळेत जाण्यासाठी मुलगा कारमधून उतरला. पण त्याचवेळी त्याची तब्येत बिघडली आणि तो जमिनीवर कोसळला. बेशुद्ध पडला. हा प्रकार बघून घाबरलेल्या वडिलांनी मुलाला उचलून घेतले. ते जवळच असलेल्या बेंचवर बसले. मुलाला मांडीवर व्यवस्थित ठेवले. नंतर वडील मुलाला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करू लागले. घटनास्थळी उपस्थित असलेली काही जण त्यांच्या मदतीला पुढे आले. सर्व जण मुलाला शुद्धीत आणण्याचे प्रयत्न करू लागले. पण मुलाकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर वडिलांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन मुलाचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले.

सातवीत शिकणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशमधील बाराबंकीतल्या फतेहपूर तहसील क्षेत्रात घडली. व्यवसायाने वकील असलेल्या जितेंद्र यांच्या मुलाचा शाळेच्या गेटजवळ मृत्यू झाला. जितेंद्र यांच्या मुलाला कोणताही आजार नव्हता. यामुळे मुलाचा आकस्मिक मृत्यू कसा झाला हा प्रश्न जितेंद्र यांना सतावत आहे. जितेंद्र यांच्या पत्नीला पोटच्या मुलाच्या मृत्यूने धक्का बसला आहे. मुलगा या जगातून कायमचा गेला आहे यावर त्यांचा अद्याप विश्वास बसलेला नाही.

मुलाच्या मृत्यानंतर नातलगांनी पोस्टमॉर्टेम न करताच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे मृत्यूचे नेमके कारण समजले नाही.
Comments
Add Comment

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक

...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग

इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे, 

जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा