राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

  46

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट

मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा प्रदेश ओळखला जात. मात्र, नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार कुपोषित बालकांच्या संख्येत महानगरांमध्येच वाढ झाल्याचे चित्र आहे. राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तब्बल १ लाख ८२ हजार ४४३ बालकं कुपोषित असल्याची सरकारची आकडेवारी असून सर्वाधिक कुपोषित बालक मुंबई उपनगरात असल्याचे धक्कादायक वास्तव देखील या आकडेवारीतून समोर आलं आहे. राज्यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या १ लाख ५१ हजार ६४३ असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या ३०,८०० एवढी आहे. पुण्यातही कुपोषित बालकांची संख्या चिंताजनक असल्याचं चित्र आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये कुपोषणाच्या आकडेवारीत वाढ झाली असून मुंबई उपनगरमध्ये १६ हजार ३४४ कुपोषित बालके आहेत. त्यात, मध्यम कुपोषित बालकांची संख्या १३,४५७तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या २८८७ एवढी आहे. राज्यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या १ लाख ५१ हजार ६४३ असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या ३०,८०० एवढी आहे. मुंबई उपनगराच्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यामध्ये कुपोषणाची संख्या वाढली. नाशिक मध्ये ९ हजार ८५२ कुपोषित बालकांची संख्या असून यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या ८,९४४ तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या १८५२ एवढी आहे. पुण्यातील मध्यम कुपोषित बालकांची संख्या ७,४१०

ठाणे जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या ७,३६६ आणि तीव्र कुपोषित बालकांची संख्या ८४४ एवढी आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातील कुपोषित बालकांची पुण्यातील संख्या कमी आहे. पुण्यात मध्यम कुपोषित बालके ७,४१०तर तीव्र कुपोषित बालके १६६६एवढी आहेत. धुळे जिल्हा मध्यम कुपोषित बालके ६,३७७ आणि तीव्र कुपोषित बालके १७४१आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्हा मध्यम कुपोषित बालके ६४८७ तर तीव्र कुपोषित बालके १४३९आहेत. नागपूर मध्यम कुपोषित बालके ६,७१५ तर तीव्र कुपोषित बालके १३७३ एवढी आहेत. कुपोषण कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजना आणि होणारा खर्च यावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचंही आकडेवारीतून समोर येत आहे.

Comments
Add Comment

Independence Day 2025: मंत्रालयात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:

मुंबईत दीड लाख नागरिकांना दरवर्षी भटक्या श्वानांचा दंश

निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी मुंबई : दिल्लीतील भटक्या

कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अध

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही