स्थानिक स्वराज्य संस्थांना 'एक टक्के' नोंदणी निधी थेट हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव!

प्रक्रिया अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार, महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती


मुंबई : नोंदणी आणि मुद्रांकशुल्कातून मिळणारा "एक टक्के निधी" स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी थेट हस्तांतरित करण्यासाठी लवकरच नवीन व्यवस्था तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह बैठक घेऊन प्रक्रिया निश्चित करण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले.


आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला येथील स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळणाऱ्या निधीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना महसूल मंत्री म्हणाले, "अकोल्यात सुमारे ३५ कोटी रुपये प्रलंबित आहेत आणि राज्यभर एकूण सुमारे ७९०० कोटी रुपये प्रलंबित आहेत. सध्या मुद्रांकशुल्क सरकारी खात्यात जमा होते आणि अर्थसंकल्पीय तरतुदीनंतरच हा निधी वितरित केला जातो. त्यामुळे निधी वितरणात ३ ते ५ वर्षांचा विलंब होतो. हे टाळण्यासाठी मुद्रांक शुल्क नोंदणीच्या त्याच दिवशी त्या रकमेच्या १ टक्के रक्कम संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खात्यात थेट जमा होण्याची व्यवस्था तयार करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे."


या उपक्रमावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्याची घोषणा देखील मंत्र्यांनी केली.
खनिज संसाधन असलेल्या गावांना थेट रॉयल्टी मिळावी या योजनेप्रमाणे खनिज उत्खननातून मिळणाऱ्या रॉयल्टीच्या २० टक्के रक्कम त्या गावाच्या स्थानिक विकासासाठी थेट वाटप करावी लागते. त्याचप्रमाणे हा एक टक्का निधी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांना ताबडतोब उपलब्ध करून द्यावा असे महसूल मंत्र्यांनी सांगितले.


राज्यभरातील प्रलंबित निधीची स्थिती




  • सर्व नगरपालिकांकडे ९७० कोटी रुपये

  • सर्व महानगरपालिकांकडे ४३२९ कोटी रुपये

  • जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींकडे २५९८ कोटी रुपये

  • एकूण ७८९७ कोटी रुपयांची रक्कम प्रलंबित

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून