Maharashtra Assembly 2025: "तळीये गावातील सर्व दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करावे"

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी


मुंबई: महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला ४  वर्षे होत आले तरी अद्याप पूर्णपणे दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करण्यात आले नाही, ही बाब विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Opposition Leader Ambadas Danve) यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. तसेच या पावसाळ्यात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी लवकरात लवकर या कुटुंबियांचे पुर्नवसन करण्याची मागणी दानवे यांनी केली.

राज्यात मागील काही काळात पुणे जिल्ह्यातील माळीण गाव,रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीये व कर्जत तालुक्यातील एका वाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अनेक गावकरी मृत्यूमुखी पडल्यानंतरही सरकारने याबाबत गंभीर दखल घेत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.

दरडग्रस्त तळीये गावात दरड कोसळून ६६ लोकांचा मृत्यू झाला असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्याचे शासनाने ठरवले होते. आतापर्यंत फक्त ६६ कुटुंबांना घरे मिळाली असून बाकीचे कुटुंब अजूनही असुरक्षित ठिकाणी राहत आहेत. सदर ठिकाणी अजूनही पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणीही दानवे यांनी केली.

या पावसाळ्यात या दरडग्रस्त भागात अशाच काही घटना घडण्याची शक्यता दानवे यांनी व्यक्त करत आज म.वि.प. नियम २८९ अन्वये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधान परिषद सभागृहात सूचना केली.
Comments
Add Comment

DCM Sunetra Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीचिन्हांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे हस्तांतरण

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव (Tribute) म्हणून तयार करण्यात आलेली

Nashik News : अखेर 'त्या' आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, महिला अधीक्षिका आणि वर्ग शिक्षक निलंबित

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कळवण (Kalwan) येथील मोहनदरी येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळेत (Mohandari Government Tribal Residential Ashram School)

Crows pick up cigarette butts : स्वीडनमध्ये सिगारेटची तुकडे उचलण्यासाठी कावळ्यांची मदत

स्वीडनमधील स्टॉकहोमजवळील सोडरटॅल्ये (Södertälje) शहरात कचरा व्यवस्थापनाचा एक अभिनव आणि रंजक प्रयोग केला जात आहे.

Aamir Khan On Sonam Wangchuk : 'रँचो' आणि सोनम वांगचुक यांचा संबंध नाही! आमिर खाननं '3 इडियट्स'च्या गैरसमजावर दिलं स्पष्टीकरण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) ‘3 इडियट्स’ (3 Idiots) चित्रपटातील ‘रँचो’ (Rancho) हे पात्र प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.