मुंबईत गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, पाण्यात उभं राहून घोषणाबाजी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी करू नये, ही मागणी घेऊन लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत. लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी आज म्हणजेच गुरुवारी ३ जुलै रोजी गिरगाव चौपाटी येथे पाण्यात उतरुन आंदोलन केले. विधान भवनात पावसाळी अधिवेशन सुरू असल्याचे लक्षात ठेवून हाके आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईत गिरगाव चौपाटी येथे पाण्यात उतरुन आंदोलन केले.

ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके आणि त्यांचे समर्थक थेट समुद्राच्या पाण्यात उतरले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोबत आणलेले बॅनर झळकवले. 'उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो' अशी घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी सरकारमधील ओबीसी नेत्यांचा आणि मंत्र्यांचाही निषेध केला.

राज्य सरकारकडून सारथी आणि बार्टी सारख्या योजनांना जेवढे अनुदान मिळते त्या तुलनेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाज्योती योजनेला पुरेसे अनुदान मिळत नाही, असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. मागील तीन वर्षांपासून महाज्योती योजनेला सारथी आणि बार्टीच्या तुलनेत कमी महत्त्व दिले जात आहे, असाही आरोप विद्यार्थ्यांनी केला. सरकार दखल घेत नसल्यामुळे समुद्रात उतरुन आंदोलन करण्याची वेळ आली, असेही आंदोलक विद्यार्थी म्हणाले.

 
Comments
Add Comment

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता 'मकोका' लागणार!

गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी; बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी संयुक्त भरारी पथके आणि सीमांवर

वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन!

आ. रोहित पवार यांचा दावा; आजोबा आणि आत्याला दिला इशारा मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

२०० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी सुरू; मंत्री उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी मुंबई :