नगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, कारण...

संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ


कोल्हापूर: राज्यात गेल्या काही दिवसांत शिक्षकांच्या आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचं चित्र आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कागल नगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक मारुती व्हरकट यांनी विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तातडीने शोधकार्य सुरू केलं. अग्निशमन विभागाच्या मदतीने आज सकाळी मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी यावेळी घटनास्थळी जमली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

मारुती व्हरकट हे कागल नगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या का केली, यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे नातेवाईक, सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्यासाठी पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत.
Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर