Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

  46

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये जीवन यशस्वी बनवण्यासाठीचे अनेक उपाय सांगितले आहेत.

चाणक्य यांच्या मते जर व्यक्ती दररोज काही खास गोष्टी लक्षात ठेवत असेल तर ती व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते. अशातच व्यक्तीने चाणक्य यांच्या काही गोष्टी जरूर लक्षात ठेवल्या पाहिजेत.

आपले लक्ष्य कधीही विसरू नका


प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणते ना कोणते लक्ष्य असणे गरजेचे असते. चाणक्य यांच्यानुसार दररोज सकाळी उठताच व्यक्तीने आपले लक्ष्य आठवावे. कारण यामुळे जीवनात उत्साह येतो. काहीतरी करण्याचे बळ मिळते. असे केल्याने व्यक्ती आपल्या निर्धारित लक्ष्यापासून भटकत नाही आणि कमी वेळात यश मिळवते.

वेळेची किंमत समजा


चाणक्य यांच्यानुसार वेळ सगळ्यात मौल्यवान आहे. प्रत्येक व्यक्तीने सकाळी उठल्यावर ठरवायला हवे की आज वेळ वाया घालवायचा नाही. जी व्यक्ती वेळेचा सदुपयोग करे त्या व्यक्तीला जीवनात यश आणि समृद्धी मिळते.

वाईट संगतीपासून दूर राहा


चाणक्य म्हणतात की व्यक्तीला नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे. चुकीच्या माणसांची संगत व्यक्तीला आणखी हताश करते. तर चांगली संगत लाभल्यास ज्ञान, सुख आणि प्रगती प्राप्त होते.

 

 
Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Assembly Session : एसटीची दुरावस्था ते ड्रग्ज तस्करी; अधिवेशनात आज ‘या’ मुद्द्यांवरून होणार खडाजंगी

विधान परिषदेत गाजणार 'हे' महत्वाचे मुद्दे  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज गाजणार आहे. एक

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन