नॅशनल हेरॉल्ड : ५० लाखात बळकावली २ हजार कोटींची मालमत्ता, राहुल आणि सोनिया गांधींसंदर्भात ईडीचा कोर्टात दावा

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधींनी ५० लाखात २ हजार कोटींची मालमत्ता बळकावल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, बुधवारी दिल्लीच्या राऊस ऐव्हेन्यू कोर्टात केला.


ईडीच्या वतीने न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू म्हणाले की, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची (एजेएल) मालमत्ता २ हजार कोटी होती.एजेएलकडे दिल्ली, लखनौ, भोपाळ, इंदूर, पंचकुला, पाटणा आणि इतर ठिकाणी मालमत्ता आहेत.


या सर्व मालमत्ता केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी १९४७ नंतर वृत्तपत्र छपाई आणि प्रकाशनासाठी प्रदान केल्या आहेत. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांच्यासमोर हे निवेदन सादर करण्यात आले. नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या फिर्यादी तक्रारीची दखल घ्यावी की नाही याबद्दल न्यायालय युक्तिवाद ऐकत आहे. सुनावणीदरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजू यांनी म्हटले की, गांधी कुटुंबाच्या जवळच्या सहकाऱ्यांना एजेएलचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पैसे वळवण्यासाठी फसवे व्यवहार करण्यात आले होते. या प्रकरणीची सुनावणी गुरुवारीही सुरू राहणार आहे.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात