अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू केले. 'एमटी यी चेंग'वर असलेल्या १४ क्रू ना वाचवण्यात आले. यात आठ खलाशी आणि सहा अधिकारी आहेत. जहाजावरील सर्व जण सुरक्षित आहेत. वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी करुन सर्व क्रू सदस्य सुखरुप असल्याचे सांगितले. आयएनएस तबर घटनास्थळाजवळ उपस्थित आहे.

भारतीय नौदलाने तातडीने कारवाई केली आणि जहाजाला लागलेली आग विझवली. यामुळे समुद्रात संकटात सापडलेले जहाज वाचले.

पलाउ देशाचा ध्वज असलेली नौका

प्रशांत (पॅसिफिक) महासागरातील पलाउ हा छोटा देश आहे. पलाउ फिलिपाईन्सच्या पूर्वेला ८०० किमी व जपानच्या दक्षिणेला ३२०० किमी अंतरावर आहे. या देशाचा ध्वज असलेली 'एमटी यी चेंग' नावाची तेलवाहक नौका अरबी समुद्रातून प्रवास करत होती. या प्रवासादरम्यान तेलवाहक जहाजाला आग लागली. आग लागल्यामुळे जहाजावरील विजेचा पुरवठा ठप्प झाला. भारतीय नौदलाने तातडीने मतकार्य सुरू केले. या मदतीमुळे जहाज आणि जहाजावरील क्रू सुरक्षित आहे. आग विझविण्यात आली आहे. आयएनएस तबरवरील नौसैनिक आणि 'एमटी यी चेंग' जहाजावरील अधिकारी - कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई करुन जहाजाच्या इंजिन रूमला लागलेली आग विझवली.

जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय वंशाचे

'एमटी यी चेंग' या तेलवाहक जहाजावरील सर्व १४ अधिकारी - कर्मचारी हे भारतीय वंशाचे आहेत. भारतीय नौदलाने या सर्वांना वाचवले आहे.

Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना