अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू केले. 'एमटी यी चेंग'वर असलेल्या १४ क्रू ना वाचवण्यात आले. यात आठ खलाशी आणि सहा अधिकारी आहेत. जहाजावरील सर्व जण सुरक्षित आहेत. वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी करुन सर्व क्रू सदस्य सुखरुप असल्याचे सांगितले. आयएनएस तबर घटनास्थळाजवळ उपस्थित आहे.

भारतीय नौदलाने तातडीने कारवाई केली आणि जहाजाला लागलेली आग विझवली. यामुळे समुद्रात संकटात सापडलेले जहाज वाचले.

पलाउ देशाचा ध्वज असलेली नौका

प्रशांत (पॅसिफिक) महासागरातील पलाउ हा छोटा देश आहे. पलाउ फिलिपाईन्सच्या पूर्वेला ८०० किमी व जपानच्या दक्षिणेला ३२०० किमी अंतरावर आहे. या देशाचा ध्वज असलेली 'एमटी यी चेंग' नावाची तेलवाहक नौका अरबी समुद्रातून प्रवास करत होती. या प्रवासादरम्यान तेलवाहक जहाजाला आग लागली. आग लागल्यामुळे जहाजावरील विजेचा पुरवठा ठप्प झाला. भारतीय नौदलाने तातडीने मतकार्य सुरू केले. या मदतीमुळे जहाज आणि जहाजावरील क्रू सुरक्षित आहे. आग विझविण्यात आली आहे. आयएनएस तबरवरील नौसैनिक आणि 'एमटी यी चेंग' जहाजावरील अधिकारी - कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई करुन जहाजाच्या इंजिन रूमला लागलेली आग विझवली.

जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय वंशाचे

'एमटी यी चेंग' या तेलवाहक जहाजावरील सर्व १४ अधिकारी - कर्मचारी हे भारतीय वंशाचे आहेत. भारतीय नौदलाने या सर्वांना वाचवले आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही