उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश


उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये  महाराष्ट्रातील सुमारे २०० पर्यटक अडकले असून यात ५० जण मुंबईतील आहे.  केदारनाथ मार्गावरील भीम बाली येथे ही घटना घडली, ज्यामुळे मार्गाचा एक भाग खराब झाला.


यमुनोत्री इथे सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. ज्यात विविध राज्यातील अनेक यात्रेकरून अडकले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील २०० पर्यटकांचा समावेश आहे, ज्यातील ५० मुंबईतील असल्याची माहिती आहे.  हवामान खात्याद्वारे उत्तराखंड मध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, अतिवृष्टीमुळे हजारो पर्यटक ठिक-ठिकाणी अडकून पडले आहेत. यमुनोत्री धाम रस्ता बंद करण्यात आला असून, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.


द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही .



चारधाम यात्रा विस्कळीत, यात्रेकरूंना तिथेच थांबण्याचे आवाहन


ढगफुटीमुळे तेहरी जिल्ह्यासारख्या इतर भागातही भूस्खलन झाले असून, त्यामुळे चार धाम यात्रा विस्कळीत झाली. बारकोट-यमुनोत्री रस्त्याला देखील याचा फटका बसला आहे, या रस्त्याचा काही भाग वाहून गेला. बद्रीनाथ महामार्ग आणि यमुनोत्री मार्गावर पुराच्या ढिगाऱ्यामुळे आणि रस्त्याच्या नुकसानीमुळे परिणाम झाला आहे, तर सिलई बंदजवळील प्रभावित रस्त्याच्या भागाची दुरुस्ती करण्यात आली आहे. रस्त्याचे इतर नुकसान झालेले भाग आणि वीज वाहिन्या दुरुस्त करण्याचे काम अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना परिस्थिती सुधारेपर्यंत तिथेच थांबण्याचा आणि प्रवास टाळण्याचा सल्ला जारी केला आहे.


अनेक भागाचे अतोनात नुकसान


हिमाचल, उत्तराखंड या राज्यांमधील अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे, त्यामुळे त्या भागाचे अतोनात नुकसान झालं असून, अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत तर काही काही घरांमध्ये पाणी भरलं असून, काही ठिकाणी पत्त्याच्या बंगल्यासारखी घरं जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळते आहे.


अनेक अहवालांवरून असे दिसून आले आहे की, अडकलेल्या यात्रेकरूंना मदत करण्यासाठी आणि कचरा साफ करण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.



 
Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार