Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी RCB(रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)ला जबाबदार ठरवले आहे. संघाने पोलिसांच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर अचानक विजयी परेडची घोषणा केली. यामुळे लाखोंच्या संख्येने गर्दी जमा झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता.


न्यायधिकारणाने आपल्या विधानात म्हटले की, प्राथमिकदृष्ट्या हे समोर दिसत आहे की साधारण तीन ते पाच लाख लोकांची गर्दी एकत्र जमा करण्यासाठी आरसीबी जबाबदार आहे. आरसीबीने पोलिसांकडून याबाबतची कोणतीही परवानगी घेतली नाही. अचानक सोशल मीडियावर पोस्ट आली आणि त्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने लोक जमा झाले.


न्यायधिकरणाने आरसीबीकडून अचानक करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची घोषणा ही अव्यवस्था पसरवणारे असल्याचे म्हटले आहे. आदेशात म्हटले की आरसीबीने कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय अचानक या प्रकारची अव्यवस्था उत्पन्न केली. त्यामुळे केवळ १२ तासांत पोलीस सर्व आवश्यक व्यवस्था पोलीस अधिनियम अंतर्गत करेल अशी आशा कशी करू शकतो.


आरसीबीने आपल्या पहिल्या आयपीएल विजयाच्या दुसऱ्या दिवशी ४ जूनला एका विजयी परेडची घोषणा सोशल मीडियावर केली होती. न्यायाधिकरणने पोलिसांच्या या भूमिकेचा बचाव करताना म्हटले, पोलीस कर्मचारीही माणूस आहेत. ते देव नाहीत आणि जादूगारही नाहीत. त्यांच्याकडे अल्लादीनचा चिराग सारखे जादूचे यंत्र नाही जे बोट फिरवल्यावर कोणाचीही इच्छा पूर्ण करू शकतील.


न्यायाधिकरणनेही हे ही स्पष्ट केले की पोलिसांना पुरेशा तयारीसाठी योग्य तो वेळ दिला गेला नाही. ४ जून २०२५ला वेळेच्या कमतरतेमुळे पोलीस आवश्यक की व्यवस्था करू शकले नाहीत. पोलिसांना पुरेसा वेळ मिळाला नाही.


Comments
Add Comment

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय! ५३ धावांनी भारताने गाठले उपांत्य फेरीत स्थान

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीसाठी आपली जागा निश्चित केली आहे.

२०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी अभिनव बिंद्रा मशालवाहक

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या २०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राची मशालवाहक

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाने पर्थ पाठोपाठ अ‍ॅडलेड ODI जिंकली

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला.

BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच पाच महिन्यांच्या सेवेनंतर महिला हवालदाराला बढती

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) इतिहासात पहिल्यांदाच पाच महिन्यांच्या सेवेनंतर महिला हवालदाराला (लेडी