Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी RCB(रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)ला जबाबदार ठरवले आहे. संघाने पोलिसांच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर अचानक विजयी परेडची घोषणा केली. यामुळे लाखोंच्या संख्येने गर्दी जमा झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता.


न्यायधिकारणाने आपल्या विधानात म्हटले की, प्राथमिकदृष्ट्या हे समोर दिसत आहे की साधारण तीन ते पाच लाख लोकांची गर्दी एकत्र जमा करण्यासाठी आरसीबी जबाबदार आहे. आरसीबीने पोलिसांकडून याबाबतची कोणतीही परवानगी घेतली नाही. अचानक सोशल मीडियावर पोस्ट आली आणि त्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने लोक जमा झाले.


न्यायधिकरणाने आरसीबीकडून अचानक करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची घोषणा ही अव्यवस्था पसरवणारे असल्याचे म्हटले आहे. आदेशात म्हटले की आरसीबीने कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय अचानक या प्रकारची अव्यवस्था उत्पन्न केली. त्यामुळे केवळ १२ तासांत पोलीस सर्व आवश्यक व्यवस्था पोलीस अधिनियम अंतर्गत करेल अशी आशा कशी करू शकतो.


आरसीबीने आपल्या पहिल्या आयपीएल विजयाच्या दुसऱ्या दिवशी ४ जूनला एका विजयी परेडची घोषणा सोशल मीडियावर केली होती. न्यायाधिकरणने पोलिसांच्या या भूमिकेचा बचाव करताना म्हटले, पोलीस कर्मचारीही माणूस आहेत. ते देव नाहीत आणि जादूगारही नाहीत. त्यांच्याकडे अल्लादीनचा चिराग सारखे जादूचे यंत्र नाही जे बोट फिरवल्यावर कोणाचीही इच्छा पूर्ण करू शकतील.


न्यायाधिकरणनेही हे ही स्पष्ट केले की पोलिसांना पुरेशा तयारीसाठी योग्य तो वेळ दिला गेला नाही. ४ जून २०२५ला वेळेच्या कमतरतेमुळे पोलीस आवश्यक की व्यवस्था करू शकले नाहीत. पोलिसांना पुरेसा वेळ मिळाला नाही.


Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक