ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत आहे. याप्रकरणी प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी विरोधकांनी केली. या मागणीला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. ताकीद देऊनही प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. प्रदूषण केल्याप्रकरणी राज्यातील ३१८ उद्योगांना उत्पादन बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.

जल प्रदूषण प्रकरणी एका कंपनीवर नियमानुसार कारवाई झाली आहे. या कंपनीला १८ जून रोजी उद्योग बंद असा आदेश देण्यात आला आहे. आणखी काही कंपन्या जल प्रदूषण करत असल्यास त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. राज्यात विना परवानगी उद्योग करता येणार नाही. अनधिकृत उद्योगांना राज्यात थारा दिला जाणार नाही. पर्यावरणाशी संबंधित नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांना राज्यात काम करता येईल. पण ज्या कंपन्या पर्यावरणाचा ऱ्हास रत असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

ठाणे जिल्ह्यात १८८० कारखाने रेड झोन मध्ये आहेत आणि साठ पेक्षा जास्त कंपन्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत.नियमानुसार प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले. भातखळकरांनी हा मुद्दा मांडताच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली.
Comments
Add Comment

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा