ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

  18

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत आहे. याप्रकरणी प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी विरोधकांनी केली. या मागणीला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. ताकीद देऊनही प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. प्रदूषण केल्याप्रकरणी राज्यातील ३१८ उद्योगांना उत्पादन बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.

जल प्रदूषण प्रकरणी एका कंपनीवर नियमानुसार कारवाई झाली आहे. या कंपनीला १८ जून रोजी उद्योग बंद असा आदेश देण्यात आला आहे. आणखी काही कंपन्या जल प्रदूषण करत असल्यास त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. राज्यात विना परवानगी उद्योग करता येणार नाही. अनधिकृत उद्योगांना राज्यात थारा दिला जाणार नाही. पर्यावरणाशी संबंधित नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांना राज्यात काम करता येईल. पण ज्या कंपन्या पर्यावरणाचा ऱ्हास रत असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

ठाणे जिल्ह्यात १८८० कारखाने रेड झोन मध्ये आहेत आणि साठ पेक्षा जास्त कंपन्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत.नियमानुसार प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले. भातखळकरांनी हा मुद्दा मांडताच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली.
Comments
Add Comment

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी