गणपतीत तुमची कारही जाणार रेल्वे मार्गावरून

कोकण रेल्वे देणार 'रो-रो' सेवा


मुंबई (प्रतिनिधी) :कोकण रेल्वे महामंडळ येत्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास रोल ऑन रोल ऑफ रेल्वे सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. ही सेवा कार वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती केआरसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली. झा यांनी स्पष्ट केले की, "जर किमान ४० कार एकावेळी वाहतूक करण्यासाठी उपलब्ध झाल्या, तर आम्ही ही विशेष सेवा नक्की सुरू करू. "असे ते म्हणाले.


कोकण रेल्वेची रो-रो सेवा प्रामुख्याने ट्रक वाहतुकीसाठी वापरली जाते, जिथे वाहन चालकही स्वतःच्या वाहनासोबत प्रवास करू शकतो. मात्र, कार वाहतुकीसाठी रो-रो सेवा यापूर्वी सुरू करण्यात आलेली नव्हती. "मला कल्पनाच नव्हती की लोकांना त्यांची महागडी कार ७५० किमी दूर नेण्याची गरज भासते," असे सांगत, ते म्हणाले की, कार वाहतुकीसाठी विशिष्ट डब्यांत बदल करावे लागतील.
२०२३-२४ या आर्थिक वeर्षात कोकण रेल्वेने ३०१ कोटींचा नफा कमावला आहे.


कोविड काळातील दोन वर्षे वगळता महामंडळ सातत्याने नफ्यात आहे. मागील १५ महिन्यांत महामंडळाने ३१५० कोटींचे प्रकल्प निविदेद्वारे मिळवले असून सध्या ४०८७ कोटींचे प्रकल्प कार्यान्वित आहेत. "या वर्षात आम्ही १५००० कोटींचे नवीन ऑर्डर्स मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते साध्य होईल," असं झा यांनी सांगितले. सध्या संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग एकेरी असून, केवळ ४७ किमीचा भाग दुहेरी आहे. उर्वरित मार्गासाठी ५१०० कोटींचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.



८ थांबे पुन्हा सुरू होणार ?


कोविड काळात बंद करण्यात आलेले ८ स्थानक थांबे पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच, पर्नेम व ओल्ड गोवा बोगद्यांसाठी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून कार्यवाटपाची प्रतीक्षा असल्याचंही झा यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त