गणपतीत तुमची कारही जाणार रेल्वे मार्गावरून

कोकण रेल्वे देणार 'रो-रो' सेवा


मुंबई (प्रतिनिधी) :कोकण रेल्वे महामंडळ येत्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास रोल ऑन रोल ऑफ रेल्वे सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. ही सेवा कार वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती केआरसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली. झा यांनी स्पष्ट केले की, "जर किमान ४० कार एकावेळी वाहतूक करण्यासाठी उपलब्ध झाल्या, तर आम्ही ही विशेष सेवा नक्की सुरू करू. "असे ते म्हणाले.


कोकण रेल्वेची रो-रो सेवा प्रामुख्याने ट्रक वाहतुकीसाठी वापरली जाते, जिथे वाहन चालकही स्वतःच्या वाहनासोबत प्रवास करू शकतो. मात्र, कार वाहतुकीसाठी रो-रो सेवा यापूर्वी सुरू करण्यात आलेली नव्हती. "मला कल्पनाच नव्हती की लोकांना त्यांची महागडी कार ७५० किमी दूर नेण्याची गरज भासते," असे सांगत, ते म्हणाले की, कार वाहतुकीसाठी विशिष्ट डब्यांत बदल करावे लागतील.
२०२३-२४ या आर्थिक वeर्षात कोकण रेल्वेने ३०१ कोटींचा नफा कमावला आहे.


कोविड काळातील दोन वर्षे वगळता महामंडळ सातत्याने नफ्यात आहे. मागील १५ महिन्यांत महामंडळाने ३१५० कोटींचे प्रकल्प निविदेद्वारे मिळवले असून सध्या ४०८७ कोटींचे प्रकल्प कार्यान्वित आहेत. "या वर्षात आम्ही १५००० कोटींचे नवीन ऑर्डर्स मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते साध्य होईल," असं झा यांनी सांगितले. सध्या संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग एकेरी असून, केवळ ४७ किमीचा भाग दुहेरी आहे. उर्वरित मार्गासाठी ५१०० कोटींचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.



८ थांबे पुन्हा सुरू होणार ?


कोविड काळात बंद करण्यात आलेले ८ स्थानक थांबे पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच, पर्नेम व ओल्ड गोवा बोगद्यांसाठी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून कार्यवाटपाची प्रतीक्षा असल्याचंही झा यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री