गणपतीत तुमची कारही जाणार रेल्वे मार्गावरून

  33

कोकण रेल्वे देणार 'रो-रो' सेवा


मुंबई (प्रतिनिधी) :कोकण रेल्वे महामंडळ येत्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास रोल ऑन रोल ऑफ रेल्वे सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. ही सेवा कार वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती केआरसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली. झा यांनी स्पष्ट केले की, "जर किमान ४० कार एकावेळी वाहतूक करण्यासाठी उपलब्ध झाल्या, तर आम्ही ही विशेष सेवा नक्की सुरू करू. "असे ते म्हणाले.


कोकण रेल्वेची रो-रो सेवा प्रामुख्याने ट्रक वाहतुकीसाठी वापरली जाते, जिथे वाहन चालकही स्वतःच्या वाहनासोबत प्रवास करू शकतो. मात्र, कार वाहतुकीसाठी रो-रो सेवा यापूर्वी सुरू करण्यात आलेली नव्हती. "मला कल्पनाच नव्हती की लोकांना त्यांची महागडी कार ७५० किमी दूर नेण्याची गरज भासते," असे सांगत, ते म्हणाले की, कार वाहतुकीसाठी विशिष्ट डब्यांत बदल करावे लागतील.
२०२३-२४ या आर्थिक वeर्षात कोकण रेल्वेने ३०१ कोटींचा नफा कमावला आहे.


कोविड काळातील दोन वर्षे वगळता महामंडळ सातत्याने नफ्यात आहे. मागील १५ महिन्यांत महामंडळाने ३१५० कोटींचे प्रकल्प निविदेद्वारे मिळवले असून सध्या ४०८७ कोटींचे प्रकल्प कार्यान्वित आहेत. "या वर्षात आम्ही १५००० कोटींचे नवीन ऑर्डर्स मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते साध्य होईल," असं झा यांनी सांगितले. सध्या संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग एकेरी असून, केवळ ४७ किमीचा भाग दुहेरी आहे. उर्वरित मार्गासाठी ५१०० कोटींचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.



८ थांबे पुन्हा सुरू होणार ?


कोविड काळात बंद करण्यात आलेले ८ स्थानक थांबे पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच, पर्नेम व ओल्ड गोवा बोगद्यांसाठी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून कार्यवाटपाची प्रतीक्षा असल्याचंही झा यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

राज्य महिला आयोगाकडून रिक्त पदांवर नियुक्ती

मुंबई (प्रतिनिधी): मुळशी तालुक्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या ढिसाळ कार्यामुळे

पंचशीलनगरला दरडीच्या तोंडी नोटीस देऊन अधिकारी निर्धास्त

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात अनेक झोपडपट्ट्या अशा आहेत, ज्या डोंगरावर किंवा डोंगर उतारावर वसल्या आहेत. त्यापैकीच

पहिल्या यादीत ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचा अकरावीत प्रवेश

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरीही राज्यातील विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळाला नव्हता.

'समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, परंतु हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत'

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सरकारला इशारा मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा संदर्भातील दोन जीआर रद्द केले आहेत.

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास, विद्यार्थी हितासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती - मुख्यमंत्री

पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर मुंबई : राज्यात सर्व

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिकांचा रंग हवा पांढरा

अन्य रंगांच्या पत्रिका असल्यास त्वरीत बदलाव्या लागणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यरत कर्मचारी