वसई -विरार शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

कचराकुंडीत कचरा जमा करण्याचे पालिकेकडून आवाहन


वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते नागरिकीकरणाच्या मानाने कचराही तितकाच वाढू लागला आहे. प्रति दिन ७०० टन कचरा हा शहरातून जमा होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाकडून क्षेपणभूमीवर जमा केला जात आहे.


वसई, नालासोपारा, विरार आणि नायगाव ही प्रामुख्याने शहरे व गावातील भागाचा समावेश महापालिकेत आहे. त्यामुळे घरातील ओला आणि सुका कचरा अधिक असतो. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नियमित नियोजन केले जात आहे; मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे.


पावसाळ्यात साचलेले पाणी, कचरा यामुळे डासांची उत्पत्ती होत असते. परिणामी, डेंगी, मलेरिया, ताप यांसह अन्य आजार उद्भवत असतात. आरोग्य विभागाकडून दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करूनही खाद्यपदार्थांचे वेष्टन, नाशवंत वस्तू यांसह प्लॅस्टिकसह अन्य कचरा दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने उपायोजना आखाव्यात, अशी मागणी केली जात आहे. नागरिकांनी कचरा कुठेही न भिरकावता कचराकुंडीत जमा करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.



कचरा वर्गीकरण करावे


कचऱ्याचे वर्गीकरण करून नागरिकांनी स्वतंत्र दोन डब्यांत कचरा जमा करावा, असे आवाहन केले; मात्र तरीही वर्गीकरण होत नाही. त्यामुळे महापालिका स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना हा कचरा वेगळा करून नंतर क्षेपणभूमीवर न्यावा लागत आहे. पालिकेला सहकार्य करून कचरा वर्गीकरण करावे, असे आवाहनही वेळोवेळी केले जात आहे.




स्वच्छता विभागाकडून नियमित कचरा उचलला जात असतो. कचरा इतरत्र न टाकता प्रत्येक भागात येणाऱ्या कचरागाडीत किंवा कचराकुंडीत जमा करावा. ज्या भागात कचरा अधिक निर्माण होत असेल, तिथे नियोजन केले जाईल.
- अर्चना दिवे, उपायुक्त


Comments
Add Comment

'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा

वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना

खाजगीकरणा विरोधात वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने; ९ ऑक्टोबरला संपाचा इशारा

पालघर : वीज कंपन्यांमधील खाजगीकरण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि

Vasai Factory Fire: वसईत कारखान्याला भीषण आग

वसई: वसईत तुंगारेश्वर फाटा येथील पुठ्ठा कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कारखान्यातील अनेक

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.