माथेरान पर्यटनस्थळी वाहतूक कोंडीचा तिढा सुटणे आवश्यक

विकेंडला दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे


माथेरान: दर विकेंडला माथेरानमध्ये मर्यादेपेक्षाही अधिक पर्यटकांची गर्दी होताना दिसते. स्वतःची वाहने आणणाऱ्या पर्यटकांना दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने वाहतुकीची कोंडी पहावयास मिळत आहे. लवकरच यावर तोडगा काढला पाहिजे अशी पर्यटकांमधून मागणी केली जात आहे.


काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी श्रमदान करून काहीअंशी पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला होता; परंतु माथेरानकडे पर्यटकांचा ओघ विकेंडला वाढतच असल्यामुळे दस्तुरी नाक्यावर शासकीय अधिकारी वर्गाला सुद्धा वाहनांना वाहतुकीसाठी मार्ग काढून देणे त्रासदायक बनलेले आहे. पार्किंगच्या ठिकाणी झाडांच्या भोवताली जांभ्या दगडांचे कठडे बांधले आहेत. त्यामुळे जागा व्यापलेली आहे. पार्किंगच्या जागेत जे काही अडथळे निर्माण झाले आहेत ते काढून टाकल्यास वाहनांची पार्किंग सुरळीतपणे होऊ शकते.


जवळपास सर्व जागाही वनखात्याच्या अखत्यारीत येत आहे आणि नगरपालिकासुद्धा वाहन कर आकारणी करते. त्यामुळे या दोन्ही खात्यांनी मिळून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे. तेव्हाच वाहतूक कोंडी संपुष्टात येईल असे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.