एसटी बसच्या एक्सलचे नट लुज; चालकांनी चालवली बस

श्रीवर्धन : मुंबईवरून बोर्लीकडे आलेली बस बोर्लीवरून आदगाव, सर्वे तसेच दिघीकडे मार्गस्थ होत असताना बोर्ली येथील जागृत नागरिकांच्या कर्तव्य दक्षतेमुळे मोठी दुर्घटना होताना टळली आहे.


सदरील बस बोर्ली स्थानकामध्ये उभी असताना मागील टायरचे एक्सेलचे नट लूज असल्याचे निदर्शनास आले. यानंतर चालकाला कल्पना देऊन बस बाजूला लावण्यास सांगितले. डिप्रेशनच्या सहाय्याने टायरला फिरवण्याचे काम करणाऱ्या एक्सलला एकूण ८ नट असतात. त्यापैकी फक्त ३ नट एक्सलला लागले होते. तर बाकीचे ५ नट पडून गेले होते. तसेच असलेले ३ नट सुद्धा हाताने फिरत होते. बसची अशी अवस्था असताना बस का बरं सोडण्यात आली होती.


हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. यामध्ये चालकाचा सुद्धा हलगर्जीपणा दिसून येत आहे. बस मुबईकडून श्रीवर्धनकडे येताना पनवेल, पेण तसेच इतर पुढील स्थानकांत थांबली होती. यावेळी चालकांनी याकडे लक्ष दिले नाही का? दिले असेल तर याची कल्पना संबंधित विभागाकडे दिली होती का याची नोंद करण्यात आली आहे का? ही बस श्रीवर्धनकडे येताना वेडी-वाकडी वळणे, चढ-उतार घेत येते.


याठिकाणी एक्सल बाहेर पडला असता तर चालकाला बस नियंत्रणात आणणे शक्य झाले असते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनुचित घटना घडली नाही म्हणून विषय सोडून देण्यापेक्षा प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई सुद्धा झाली पाहिजे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग