Rajesh Meena: महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिवपदी वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना यांची नियुक्ती

मुंबई: आज, ३० जून २०२५ रोजी वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना (Rajesh Kumar Meena)  यांना मुख्य सचिवपदी (Chief Secretary of Maharashtra) नियुक्त करण्यात आले. सुजाता सौनिक (Sujata Saunik) निवृत्त झाल्यानंतर त्यांचा कार्यभार तात्काळ लागू झाला. राजेश कुमार मीना मूळचे राजस्थानचे असून, ते महाराष्ट्र कॅडरचे एक वरिष्ठ आणि कार्यक्षम प्रशासक मानले जातात.


राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील रहिवासी आणि १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.  अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर जबाबदारी सांभाळणाऱ्या या अधिकाऱ्याला आता महाराष्ट्र नोकरशाहीचे सर्वोच्च पद देण्यात आले आहे. 



राजेशकुमार मीना यांच्या नियुक्तीचे कारण


राजेशकुमार मीना यांच्यासोबतच राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हेदेखील शर्यतीत होते. पण, प्रशासनात राजेशकुमार मीना हे सर्वात ज्येष्ठ असल्याने राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी सरकारकडून त्यांच्या नावालाच अधिक पसंती देण्यात आली आहे.  

राजेश मीना महसूल विभागात एसीएस


राजेश कुमार मीना यांना कामाचा व्यापक अनुभव आहे. ते सध्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध विभागांमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 



निवृत्तीच्या २ महिने आधी जबाबदारी


यापूर्वी सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या सीएस होत्या, त्या आज (३० जून) निवृत्त झाल्या.  त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव देखील होत्या. त्याच वेळी, राजेश कुमार मीना या वर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या २ महिनेआधी, महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठी त्यांच्याकडे जुलै आणि ऑगस्ट असा दोन महिन्यांचा कालावधी असणार आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या तर राजेशकुमार मीना यांना मुख्य सचिव पदासाठी मुदतवाढ मिळू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी अजोय मेहता, नितीन करीर या दोन ज्येष्ठ माजी सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात राज्याच्या मुख्य सचिव पदावर मुदतवाढ मिळाली होती.


 
Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली