उद्धव ठाकरेंचे बेगडी मराठी प्रेम, खासदार राणेंची टीका

मुंबई : मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीचा जीआर काढणारे उद्धव ठाकरे आता झोपेचं सोंग घेत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पाठोपाठ खासदार नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचे मराठी प्रेम बेगडी आहे. राजकीय स्वार्थासाठी उद्धव 'मराठी प्रेम' दाखवत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचे मराठी प्रेम कुठे गेले होते ? मराठी माणसाच्या नोकरी, व्यवसायासाठी, पोटाच्या प्रश्नासाठी उद्धव ठाकरेंनी काय केले ? मराठीच्या नावावर फक्त स्वतःचे कल्याण करुन घेतले. मराठी माणसाच्या आणि मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय ? असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राची राजधानी असूनही मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी १८ पर्यंत खाली घसरली आहे. याला जबाबदार कोण ? असाही प्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. मागील दोन दशकांपेक्ष जास्त काळापासून मुंबई महापालिकेत ठाकरेंची सत्ता आहे. पण याच काळात मुंबईतून मराठी माणूस हळू हळू हद्दपार होऊ लागला. उद्धव ठाकरेंना मराठी माणसांविषयी प्रेम आहे असे ते म्हणतात. पण उद्धव ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत का शिकली ? असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल, या शब्दात खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास