कोकणात पक्षाची ताकद वाढवणारे रविंद्र चव्हाण होणार महाराष्ट्र भाजपाध्यक्ष

मुंबई : राज्यात महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. भाजपाकडून निवडणूक अधिकारी म्हणून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी नेमणूक झाली आहे. सोमवारी ३० जून २०२५ रोजी महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदासाठी रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्यातील भाजपाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला. अद्याप महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदासाठी रविंद्र चव्हाण यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज आलेला नाही. यामुळे रविंद्र चव्हाण यांची निवड ही निव्वळ औपचारिकता असल्याची चर्चा आहे.

रविंद्र चव्हाण यांनी भाजपाचे युवा कार्यकर्ता ते मंत्री असा प्रवास केला आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल. कोकणात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी आली तर कोकणात पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

रविंद्र चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज

‘"राष्ट्र प्रथम्, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" हा भाजपा परिवाराचा मूलमंत्र अनुसरून, अंत्योदयाच्या मार्गावर आजवर वाटचाल करत आलो. या वाटचालीत पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ आणि जनतेचे आशीर्वाद लाभले. या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या पाठबळावर आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केंद्रीय मंत्री किरेनजी रिजिजू यांच्याकडे सुपूर्द केला. यापुढच्या वाटचालीत देखील तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मोलाचे ठरणार आहेत,’ असे रविंद्र चव्हाण म्हणाले.



Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये