Devendra Fadnavis : दोन भावांनी एकत्र येऊ नये असा GR मी काढलाय का? दोघांनी एकत्र यावं अन् क्रिकेट खेळावं; आम्हाला काहीही फरक... : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेसंबंधी काढण्यात आलेले जीआर राज्य शासनाने रद्द ठरवले. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विषय असल्याचं ठाकरे बंधूंनी सांगितलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही निर्णय घेताना कोणत्याही पक्षाचं हित पाहणार नाही, आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित पाहणार. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता योग्य तोच निर्णय घेऊन असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा काही जीआर आम्ही काढला नाही, त्यांनी एकत्र यावं आणि किक्रेट खेळावं, जेवण करावं. आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.



काय म्हणाले फडणवीस ?


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या नेत्याने हिंदी सक्तीची करा अशी शिफारस केली होती. तो अहवाल उद्धव ठाकरेंनी स्वीकारला. त्यामुळे हिंदीचा निर्णय त्यांच्या कार्यकाळातच झाला होता. हे दुटप्पी लोक आहेत. याचं सत्तेतले रुप वेगळं आणि विरोधातले रुप वेगळं आहे."



क्रिकेट खेळावं अन् टेनिस खेळावं


ठाकरे बंधू एकत्र न येण्यासाठी भाजप प्रयत्न करतंय का असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये म्हणून मी जीआर काढलेला नाही. दोन भावांना एकत्र येण्यासाठी मी रोखलंय का? त्यांनी एकत्र यावे, क्रिकेट खेळावं, टेनिस खेळावं, जेवण करावं, काहीही करावं आम्हाला काहीही फरक पडत नाही." पुढे फडणवीस म्हणाले की, "राज्यात त्रिभाषा सूत्र स्वीकारायचं की नाही यावर आम्ही एक समिती नेमली आहे. ती समिती आता ठरवेल. आम्ही कुठल्याही पक्षाचं हित पाहणार नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं हित पाहणार. कुणाच्याही दबावाखाली झुकणार नाही."

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी