वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या रिक्षाचालकांवर गुन्हे

डोंबिवली  : शहरातील पश्चिम रेल्वेस्थानक भागात वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दोन रिक्षाचालकांवर विष्णुनगर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. विष्णुनगर पोलिस ठाण्याचे हवालदार श्रीराम मिसाळ, आंबिवले, अंकुलकर रेल्वेस्थानक परिसरात गस्त घालत असताना रिक्षाचालक राहुल कुमरे हा रिक्षा वाहनतळ सोडून महात्मा गांधी रस्त्यावरील रसरंजन हॉटेलसमोर प्रवासी वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी करून होता.


रस्त्यात रिक्षा उभी केल्याने पादचारी, वाहतुकीला अडथळा येत होता. गस्तीवरील पोलिसांनी रिक्षाचालक राहुल कुमरे यास नियमबाह्य पद्धतीने रिक्षा रस्त्यावर उभी केल्याचे सांगितले. यामुळे अपघात होण्याची, वाहतुकीला अडथळा होत असल्याची कारणे देत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.



दुसऱ्या घटनेत हनुमंत दत्तात्रय पष्टे हे रिक्षाचालक डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या विष्णुनगर मासळी बाजाराच्या ठिकाणी रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतुकीसाठी उभे होते. ते गणेशनगर भागात राहतात.


विष्णुनगर मासळी बाजार भागात रेल्वेस्थानकातून बाहेर येणारे प्रवासी, महात्मा गांधी रस्ता, कोपर उड्डाणपूल, गुप्ते रस्ता भागातून पादचारी, वाहने येत असतात. या गर्दीच्या भागात हनुमंत पष्टे यांनी वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभी केली. वेगात असलेल्या वाहनाची धडक रिक्षेला बसली तर अपघाताची शक्यता होती.


त्यामुळे पोलिसांनी हनुमंत पष्टे यांच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Comments
Add Comment

Dombivli Shardul Vichare : डोंबिवलीच्या शार्दुलने CA इंटरमीडिएटमध्ये देशात पटकावला पहिला क्रमांक

डोंबिवली : डोंबिवलीतून अभिमानाची बातमी समोर आली आहे. डोंबिवलीच्या शार्दुल शेखर विचारे याने इन्स्टिट्यूट ऑफ

Badlapur Accident : भरधाव BMW रस्त्यावर पलटली; भीषण अपघातात दोन जण ठार

बदलापूर : बदलापूर (Badlapur) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Accident) दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून

Ulhasnagar Lizard In Manchurian : उल्हासनगरात धक्कादायक प्रकार! मंचुरियनमध्ये पालीचे पिल्लू

मुंबई : अन्नसुरक्षेचा (Food Safety) गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये एका चायनीज सेंटरमधून (Chinese Centre)

Ambernath News: डॉक्टर पतीचा 'तो' त्रास असाह्य; लग्नाच्या दीड महिन्यात नवविवाहितेची आत्महत्या

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath) एका २६ वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)

Yamdut Campaign : दिवा स्थानकात रेल्वे पोलिसांची अनोखी ‘यमदूत’ मोहीम; रुळ ओलांडणाऱ्यांचे प्रबोधन

ठाणे: रेल्वे रुळ ओलांडण्याच्या धोकादायक सवयीला आळा घालण्यासाठी आणि वाढते रेल्वे अपघात रोखण्यासाठी ठाणे रेल्वे

Thane News: 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण; ठाणे वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई

ठाणे : चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे एका बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण