पहिल्या यादीत ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचा अकरावीत प्रवेश

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरीही राज्यातील विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळाला नव्हता. यामुळे राज्यातील विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने राबवली जात असलेली ही अकरावी प्रवेश प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली जात होती.


ढकलेल्या वेळापत्रकानुसार सोमवारी ही यादी जाहीर होणार होती. अखेर काम पूर्ण झाल्याने ही यादी शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून पहिल्या प्रवेश यादीत राज्यातील ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. यामध्ये कला शाखेच्या १ लाख ४९ हजार ७९१विद्यार्थ्यांचा, वाणिज्य शाखेच्या १ लाख ३९ हजार ६०२ विद्यार्थ्यांचा तर विज्ञान शाखेच्या ३ लाख ४२ हजार ८०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सोमवारपासून ते ७ जुलैपर्यंत प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.


या यादीत सर्वाधिक पहिल्या पसंतीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. दुसऱ्या पसंतीचे ७७ हजार ०९९, तिसऱ्या पसंतीचे ३६ हजार ९०१ मिळाले आहेत. तर अर्ज केलेल्या १० लाख ६६ हजार विद्यार्थ्यांच्यापैकी अजूनही तब्बल ४ लाख ३३ हजार ८११ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीची वाट पहावी लागणार आहे.


१२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचे जाहीर केले असले तरी या यादीत १० लाख ६६ हजार ५ विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. यामध्ये सर्वाधिक ६ लाख ९ हजार ७१८ विद्यार्थ्यांचे अर्ज विज्ञान शाखेसाठी आले आहेत.


तर कला शाखेसाठी २ लाख ३१हजार ३५६ आणि वाणिज्य शाखेसाठी २ लाख २४ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या अर्जांपैकी एकूण ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे. विज्ञान शाखेतून ३ लाख ४२ हजार ८०१, कला शाखेमध्ये १ लाख ४९ हजार ७९१, तर वाणिज्यमध्ये १ लाख ३९ हजार ६०२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. अजूनही राज्यातील ४ लाख ३३ हजार ८११ विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. यामध्ये २.६६ लाख विद्यार्थी विज्ञान शाखेतील सर्वधिक आहेत. या विद्यार्थ्यांना अकरावीच्या पुढील फेऱ्यात प्रवेशाची वाट पहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास