पहिल्या यादीत ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचा अकरावीत प्रवेश

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरीही राज्यातील विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळाला नव्हता. यामुळे राज्यातील विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने राबवली जात असलेली ही अकरावी प्रवेश प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली जात होती.


ढकलेल्या वेळापत्रकानुसार सोमवारी ही यादी जाहीर होणार होती. अखेर काम पूर्ण झाल्याने ही यादी शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून पहिल्या प्रवेश यादीत राज्यातील ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. यामध्ये कला शाखेच्या १ लाख ४९ हजार ७९१विद्यार्थ्यांचा, वाणिज्य शाखेच्या १ लाख ३९ हजार ६०२ विद्यार्थ्यांचा तर विज्ञान शाखेच्या ३ लाख ४२ हजार ८०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सोमवारपासून ते ७ जुलैपर्यंत प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.


या यादीत सर्वाधिक पहिल्या पसंतीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. दुसऱ्या पसंतीचे ७७ हजार ०९९, तिसऱ्या पसंतीचे ३६ हजार ९०१ मिळाले आहेत. तर अर्ज केलेल्या १० लाख ६६ हजार विद्यार्थ्यांच्यापैकी अजूनही तब्बल ४ लाख ३३ हजार ८११ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीची वाट पहावी लागणार आहे.


१२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचे जाहीर केले असले तरी या यादीत १० लाख ६६ हजार ५ विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. यामध्ये सर्वाधिक ६ लाख ९ हजार ७१८ विद्यार्थ्यांचे अर्ज विज्ञान शाखेसाठी आले आहेत.


तर कला शाखेसाठी २ लाख ३१हजार ३५६ आणि वाणिज्य शाखेसाठी २ लाख २४ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या अर्जांपैकी एकूण ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे. विज्ञान शाखेतून ३ लाख ४२ हजार ८०१, कला शाखेमध्ये १ लाख ४९ हजार ७९१, तर वाणिज्यमध्ये १ लाख ३९ हजार ६०२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. अजूनही राज्यातील ४ लाख ३३ हजार ८११ विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. यामध्ये २.६६ लाख विद्यार्थी विज्ञान शाखेतील सर्वधिक आहेत. या विद्यार्थ्यांना अकरावीच्या पुढील फेऱ्यात प्रवेशाची वाट पहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मोठी बातमी! मुंबईत २३ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान जमावबंदी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची करडी नजर

नवी दिल्ली : 'नीट' (NEET) परीक्षेचा मुद्दा आणि रोजगाराच्या प्रश्नावर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कायदा व

Ashish Shelar : भांडूप पक्षी उद्यानासाठी 'डीपीडिसी'मधून ४५ कोटी

पालकमंत्री आशिष शेलार यांची माहिती; पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना मुंबई : मुंबई उपनगरातील

Mumbai MHADA Lottery 2026 : म्हाडा लॉटरीची प्रतीक्षा अखेर संपणार! मुंबईतील २,६४० घरांच्या सोडतीबाबत मोठे अपडेट

मुंबई : मुंबईत (Mumbai) स्वतःचे घर (Home) घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली

BMC News : महापालिका सभागृहाचे कामकाज कुणामुळे फसते?

सभागृहातील कामकाज पद्धतीवर प्रश्नचिन्ह मुंबई : मुंबई महापालिकेचे (BMC) सभागृहाच्या कामकाज हे १८८८ च्या

BEST Bus Accident : मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात, एका वृद्धाचा मृत्यू, अनेक जण जखमी

मुंबई: मुंबईतील मानखुर्द परिसरात सोमवारी सकाळी बेस्ट बसचा अपघात झाला. सायन-पनवेल (Sion Panvel Highway) महामार्गावरील

FIFA World Cup Final 2026 : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आता थेट पहाटे ४ पर्यंत हॉटेलमधून लुटता येणार मॅचचा आनंद

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना महाराष्ट्रातील फुटबॉल