पेशवेकालीन कागदपत्रांमधून उलगडला किल्ले मानगडाचा इतिहास

टेहाळणीसाठी किल्ल्याचे विशेष महत्त्व


माणगाव : दुर्गराज किल्ले रायगडाचा उपदुर्ग समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक किल्ले मानगडाच्या संदर्भातील पेशवेकालीन नोंदी सापडल्या असून यामुळे मानगडाच्या इतिहासाचे अनेक अपरिचित पैलू उलगडले आहेत .


पुणे पुराभिलेख कार्यालयातील मोडीलिपी कागदपत्रांमधून किल्ले मानगडावर वेताळ बुरुज, गडदचा बुरुज, सबजा बुरुज, फत्या बुरुज, नगारा बुरुज असे तब्बल चौदा बुरुजांची नावे सापडल्याने शिवकाळात टेहळणीसाठी मानगडाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.


पुण्यातील इतिहास अभ्यासक तसेच मोडीलिपी अभ्यासक राज ऊर्फ योगेंद्र मेमाणे यांनी शोधलेल्या इसवी सन १७८४ मधील या नोंदींनुसार मानगडावरील इमारती सदर, दिवाणघर, चिरेबंदी कोठी, मोदीखाना ( तोफखाना ), बंगला, तारांगणनजीकची दिंड , कोठी आरकसी असा उल्लेखही सापडला आहे. विशेष बाब म्हणजे मानगडावरील एका पाण्याच्या टाक्याचे नाव ‘गंगासागर’ असल्याची महत्त्वपूर्ण नोंदही आढळली आहे.


किल्ले मानगडावरील पेशवेकालीन संरक्षण व्यवस्थेमधील अधिकारी सरनोबत , सरनाईक, कारखानीस, सबनीस असे असून त्यामध्ये सरदार तुळाजीराव पासलकर, हवालदार निम्हण आणि जनार्दन गोविंद फडणीस यांची नावेसुद्धा कागदपत्रांमधून उजेडात आली आहेत.


गडावर विंझाई, भैरव आणि सबजाई या तीन देवतांची मंदिरे सन १७८४ मध्ये अस्तित्वात असल्याचेही या मोडीलिपीतील कागदपत्रांमधून उलगडले आहे. छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या १११ किल्ल्यांच्या यादीत मानगडाचा उल्लेख असून नव्याने उजेडात आलेल्या या पेशवेकालीन कागदपत्रांचे महत्व इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणीच आहे असे मत मानगड अभ्यासक रामजी कदम यांनी व्यक्त केले. टेहळणीसाठीचा गड म्हणून मानगडाचे विशेष महत्त्व आहे.

Comments
Add Comment

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.

Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून

Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव