पेशवेकालीन कागदपत्रांमधून उलगडला किल्ले मानगडाचा इतिहास

टेहाळणीसाठी किल्ल्याचे विशेष महत्त्व


माणगाव : दुर्गराज किल्ले रायगडाचा उपदुर्ग समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक किल्ले मानगडाच्या संदर्भातील पेशवेकालीन नोंदी सापडल्या असून यामुळे मानगडाच्या इतिहासाचे अनेक अपरिचित पैलू उलगडले आहेत .


पुणे पुराभिलेख कार्यालयातील मोडीलिपी कागदपत्रांमधून किल्ले मानगडावर वेताळ बुरुज, गडदचा बुरुज, सबजा बुरुज, फत्या बुरुज, नगारा बुरुज असे तब्बल चौदा बुरुजांची नावे सापडल्याने शिवकाळात टेहळणीसाठी मानगडाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.


पुण्यातील इतिहास अभ्यासक तसेच मोडीलिपी अभ्यासक राज ऊर्फ योगेंद्र मेमाणे यांनी शोधलेल्या इसवी सन १७८४ मधील या नोंदींनुसार मानगडावरील इमारती सदर, दिवाणघर, चिरेबंदी कोठी, मोदीखाना ( तोफखाना ), बंगला, तारांगणनजीकची दिंड , कोठी आरकसी असा उल्लेखही सापडला आहे. विशेष बाब म्हणजे मानगडावरील एका पाण्याच्या टाक्याचे नाव ‘गंगासागर’ असल्याची महत्त्वपूर्ण नोंदही आढळली आहे.


किल्ले मानगडावरील पेशवेकालीन संरक्षण व्यवस्थेमधील अधिकारी सरनोबत , सरनाईक, कारखानीस, सबनीस असे असून त्यामध्ये सरदार तुळाजीराव पासलकर, हवालदार निम्हण आणि जनार्दन गोविंद फडणीस यांची नावेसुद्धा कागदपत्रांमधून उजेडात आली आहेत.


गडावर विंझाई, भैरव आणि सबजाई या तीन देवतांची मंदिरे सन १७८४ मध्ये अस्तित्वात असल्याचेही या मोडीलिपीतील कागदपत्रांमधून उलगडले आहे. छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या १११ किल्ल्यांच्या यादीत मानगडाचा उल्लेख असून नव्याने उजेडात आलेल्या या पेशवेकालीन कागदपत्रांचे महत्व इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणीच आहे असे मत मानगड अभ्यासक रामजी कदम यांनी व्यक्त केले. टेहळणीसाठीचा गड म्हणून मानगडाचे विशेष महत्त्व आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित