
अफगाणिस्तानमध्ये २०२१ मध्ये तालिबानची सत्ता आली. यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावाद वाढला. हा वाद वाढू लागला आणि पाकिस्तानच्या वायव्य सीमेवर हल्ले होण्यास सुरुवात झाली. ताज्या हल्ल्यासाठी ५०० किलो पेक्षा जास्त स्फोटकांनी भरलेले वाहन वापरण्यात आले. शनिवार २८ जून २०२५ रोजी झालेला हल्ला हा पाकिस्तानच्या सैनिकांवर आठवड्याभरात झालेला दुसरा हल्ला आहे. याआधी काही दिवसांपूर्वी दक्षिण वझिरिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यात मेजर मोईझ अब्बाससह बारा सैनिक ठार झाले होते.