एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

  19

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस... प्रथेप्रमाणे पंढरीस वारी पोहोच करण्याची पिढ्यानंपिढ्याची परंपरा... अशा सर्व सकारात्मकतेमुळे यंदा आषाढी यात्र सुमारे 22 ते 25 लाख भरेल, असा अंदाज पंढरपुरात व्यक्त होत आहे. या दरम्यान, प्रत्येक मिनिटाला सुमारे साठ भाविकांना विठुरायाचे दर्शन होईल. अशा पद्धतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नियोजन केले आहे.


आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा 6 जुलै रोजी साजरा होत आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी यात्रा मोठी भरण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन भाविकांना अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविण्यासाठी तयारी सुरू आहे.


सध्या मंदिर समितीकडून तिरुपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन पास देऊन भाविकांना जलद दर्शन देण्याची व्यवस्था सुरू केली आहे. टोकन दर्शनाची चाचणी घेण्यात येत आहे. 1800 भाविकांना दररोज टोकन पास दर्शन मिळत आहे. मात्र, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांची दर्शन रांगेतील गर्दी विचारात घेता टोकन दर्शन चाचणी थांबवण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार!

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई : मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करून

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.