आश्रम बांधण्यासाठी वाळू आणली असता शेजारच्या कुटुंबाने वाद घालत शिवीगाळ केली होती; असे संगीताच्या वडिलांनी, अण्णासाहेब पवार यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी वादातून संगीताची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला.
चिंचडगावमध्ये २००७ मध्ये दीड एकर जमीन घेतली. तेव्हापासून शेजारचं कुटुंब आमच्याशी वाद घालत होते. त्यानंतर ही जमीन मी मुलगी संगीता हिला दिली. संगीता या जमिनीवर आश्रम बांधणार होती. त्यासाठी जमिनीवर वाळू आणण्यात आली. यावेळी शेजारील कुटुंबाने वाद घातला. चौदा एप्रिल रोजी विरगाव पोलीस ठाण्यात शेजारच्या चौधरी कुटुंबाच्या विरोधात तक्रार दिली. माझ्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचा देखील उल्लेख केला होता. त्यानंतर माझ्या मुलीची हत्या झाल्याचे वडील अण्णासाहेब पवार म्हणाले. अण्णासाहेब पवारांनी दिलेली माहिती आणि व्यक्त केलेला संशय याआधी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू आहे.