जमिनीच्या वादातून महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या ?

  79

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारातील आश्रमात राहणाऱ्या महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीता पवार यांची शुक्रवारी रात्री दगडाने ठेचून हत्या झाली. मोहटादेवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले. त्यावेळी आश्रमाचे कुलूप गेट तोडलेले दिसले. त्यांनी आत जाऊन बघितले त्यावेळी संगीता पवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी हत्येप्रकरणी तपास सुरू केला आहे.

आश्रम बांधण्यासाठी वाळू आणली असता शेजारच्या कुटुंबाने वाद घालत शिवीगाळ केली होती; असे संगीताच्या वडिलांनी, अण्णासाहेब पवार यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी वादातून संगीताची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला.

चिंचडगावमध्ये २००७ मध्ये दीड एकर जमीन घेतली. तेव्हापासून शेजारचं कुटुंब आमच्याशी वाद घालत होते. त्यानंतर ही जमीन मी मुलगी संगीता हिला दिली. संगीता या जमिनीवर आश्रम बांधणार होती. त्यासाठी जमिनीवर वाळू आणण्यात आली. यावेळी शेजारील कुटुंबाने वाद घातला. चौदा एप्रिल रोजी विरगाव पोलीस ठाण्यात शेजारच्या चौधरी कुटुंबाच्या विरोधात तक्रार दिली. माझ्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचा देखील उल्लेख केला होता. त्यानंतर माझ्या मुलीची हत्या झाल्याचे वडील अण्णासाहेब पवार म्हणाले. अण्णासाहेब पवारांनी दिलेली माहिती आणि व्यक्त केलेला संशय याआधी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू आहे.

 
Comments
Add Comment

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम