जिल्ह्यात २१ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे नवे प्रकल्प

रोजगार संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार


अलिबाग : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत महाराष्ट्र सरकारच्या विविध उद्योगांबरोबर झालेल्या करारांतून मोठे उद्योग राज्यात येत आहेत. त्यायोगे मोठी गुंतवणूक होऊन रोजगार संधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यात या माध्यमातून २१ हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीचे नवीन प्रकल्प येत आहेत.


रायगड जिल्ह्यात या अंतर्गत होणाऱ्या उद्योगांमध्ये पनवेल तालुक्यातील तळोजा येथे सुमारे १२ हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प, तळेगाव-भिवपुरी येथे आदिनी एनर्जी सोल्युशनचा १६६० कोटींचा ग्रीन पॉवर ट्रान्स्मिशन प्रोजेक्ट, तर दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र विस्ताराचा ७ हजार ३६० कोटींचा प्रकल्प हे प्रमुख प्रकल्प आहेत.


या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे ३ लाख थेट रोजगार व सुमारे ५ लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. या निमित्ताने पनवेल, कर्जत आणि श्रीवर्धन तालुक्यांत विकासात्मक मोठे परिवर्तन घडून येणार आहे.दरम्यान, लवकरच सुरू होण्याच्या टप्प्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील विकासाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, विविध गृहनिर्माण प्रकल्पांसह पूरक (अन्सि-लरी) उद्य उद्योगांमध्ये वाढ होणार असल्याची माहिती शासकीय सुत्रांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.

Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून

Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव