जिल्ह्यात २१ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे नवे प्रकल्प

रोजगार संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार


अलिबाग : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत महाराष्ट्र सरकारच्या विविध उद्योगांबरोबर झालेल्या करारांतून मोठे उद्योग राज्यात येत आहेत. त्यायोगे मोठी गुंतवणूक होऊन रोजगार संधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यात या माध्यमातून २१ हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीचे नवीन प्रकल्प येत आहेत.


रायगड जिल्ह्यात या अंतर्गत होणाऱ्या उद्योगांमध्ये पनवेल तालुक्यातील तळोजा येथे सुमारे १२ हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प, तळेगाव-भिवपुरी येथे आदिनी एनर्जी सोल्युशनचा १६६० कोटींचा ग्रीन पॉवर ट्रान्स्मिशन प्रोजेक्ट, तर दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र विस्ताराचा ७ हजार ३६० कोटींचा प्रकल्प हे प्रमुख प्रकल्प आहेत.


या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे ३ लाख थेट रोजगार व सुमारे ५ लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. या निमित्ताने पनवेल, कर्जत आणि श्रीवर्धन तालुक्यांत विकासात्मक मोठे परिवर्तन घडून येणार आहे.दरम्यान, लवकरच सुरू होण्याच्या टप्प्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील विकासाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, विविध गृहनिर्माण प्रकल्पांसह पूरक (अन्सि-लरी) उद्य उद्योगांमध्ये वाढ होणार असल्याची माहिती शासकीय सुत्रांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या