खोडाळा हायस्कूलचे पत्रे पावसाळ्यातही गायब !

  18

मोखाडा : खोडाळा येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ संस्थेची अनुदानित शाळा आहे. या शाळेत खोडाळा आणि परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चांगल्या सुखसोयी भौतिक सुविधा देणे शाळा व्यवस्थापनाचे काम आहे. मात्र अतिशय पडकी इमारत असल्याने स्पार्क फाऊंडेशन या संस्थेने मदतीचा हात देत दोन वर्षांपूर्वी या वर्ग खोल्या दुरुस्त्या करून रंगरंगोटी करून खोल्या सुंदर केल्या होत्या; परंतु मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यात या हायस्कुलचे पत्र्याचे छप्पर उडून गेले आहे. तसेच १६ मे रोजी उडालेले छत महिना होऊन ही दुरुस्ती न केल्याने ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांची मात्र बसायची अडचण झालेली असून शिक्षण घ्यायचे कसे असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे शाळेवर छत बसवण्याची जबाबदारी कोणाची हा खरा सवाल आहे.


खोडाळा हायस्कूल येथे १० वी पर्यंतचे वर्ग असून परीक्षा केंद्र सुद्धा याठिकाणी आहे. गोर गरीबांना शिक्षण मिळावे, आपली मुल स्थानिक पातळीवर शिकावी यासाठी तब्बल ५० वर्षांपर्वी हे हायस्कूल याठिकाणी सुरू करण्यात आले तिथून ग्रामस्थ व्यवस्थापन समिती यांच्या प्रयत्नाने वर्ग खोल्या, हॉल अशा भौतिक सुविधा पुरवण्यासाठी खोडाळा ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करीत ही शाळा उभारली. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आता ग्रामस्थ आणि स्कूल कमिटी कडून करण्यात येत आहे. कारण दीड महिना होऊनही हे उडालेले पत्रे शाळेवर टाकण्यास संस्था चालक अनुत्सुक असल्याचे दिसून येत असल्याने आम्ही शिक्षण देतो म्हणजे जनुकाही उपकार करतो अशा प्रकारचे दुर्लक्ष या शाळेकडे करीत आहेत.




"आम्ही या बाबत स्थानिक स्कूल कमिटीची बैठका बोलावली होती. यामध्ये शाळा संस्थेचा प्रतिनिधींना सुद्धा बोलावण्यात आले होते; परंतु संस्था फक्त ५० हजार द्यायला तयार असून बाकी ग्रामस्थांनी मदत करावी अशी भूमिका मांडत यामुळे नेहमीच ग्रामस्थांनी किती मदत करायची, संस्थेची काही जबाबदारी आहे की नाही हा आमचा प्रश्न आहे."
- प्रल्हाद कदम,
चेअरमन स्कूल कमिटी
खोडाळा हायस्कूल.


Comments
Add Comment

पालघर नगर परिषदेचे पैसे ‘पाण्यात’!

२० गावांकडे ७ कोटी थकले पालघर : पालघर नगर परिषदेसह जवळच्या वीस गावांनी गेल्या पंधरा वर्षापासून एकाच योजनेतून

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील

जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

सहा हजार हेक्टरवर भातपेरणी, जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड अलिबाग  : पावसाळ्याला यंदा मे

आणीबाणी काळ म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई !

पालघर: संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना २५ जून १९७५ रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली. या

सूर्या प्रकल्पातून वाढीव पाणी मिळणार नाही

पालघरसह २० गावांना शोधावा लागणार दुसरा पर्याय गणेश पाटील पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रासह नजीकच्या २० गावांना