खोडाळा हायस्कूलचे पत्रे पावसाळ्यातही गायब !

मोखाडा : खोडाळा येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ संस्थेची अनुदानित शाळा आहे. या शाळेत खोडाळा आणि परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चांगल्या सुखसोयी भौतिक सुविधा देणे शाळा व्यवस्थापनाचे काम आहे. मात्र अतिशय पडकी इमारत असल्याने स्पार्क फाऊंडेशन या संस्थेने मदतीचा हात देत दोन वर्षांपूर्वी या वर्ग खोल्या दुरुस्त्या करून रंगरंगोटी करून खोल्या सुंदर केल्या होत्या; परंतु मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यात या हायस्कुलचे पत्र्याचे छप्पर उडून गेले आहे. तसेच १६ मे रोजी उडालेले छत महिना होऊन ही दुरुस्ती न केल्याने ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांची मात्र बसायची अडचण झालेली असून शिक्षण घ्यायचे कसे असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे शाळेवर छत बसवण्याची जबाबदारी कोणाची हा खरा सवाल आहे.


खोडाळा हायस्कूल येथे १० वी पर्यंतचे वर्ग असून परीक्षा केंद्र सुद्धा याठिकाणी आहे. गोर गरीबांना शिक्षण मिळावे, आपली मुल स्थानिक पातळीवर शिकावी यासाठी तब्बल ५० वर्षांपर्वी हे हायस्कूल याठिकाणी सुरू करण्यात आले तिथून ग्रामस्थ व्यवस्थापन समिती यांच्या प्रयत्नाने वर्ग खोल्या, हॉल अशा भौतिक सुविधा पुरवण्यासाठी खोडाळा ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करीत ही शाळा उभारली. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आता ग्रामस्थ आणि स्कूल कमिटी कडून करण्यात येत आहे. कारण दीड महिना होऊनही हे उडालेले पत्रे शाळेवर टाकण्यास संस्था चालक अनुत्सुक असल्याचे दिसून येत असल्याने आम्ही शिक्षण देतो म्हणजे जनुकाही उपकार करतो अशा प्रकारचे दुर्लक्ष या शाळेकडे करीत आहेत.




"आम्ही या बाबत स्थानिक स्कूल कमिटीची बैठका बोलावली होती. यामध्ये शाळा संस्थेचा प्रतिनिधींना सुद्धा बोलावण्यात आले होते; परंतु संस्था फक्त ५० हजार द्यायला तयार असून बाकी ग्रामस्थांनी मदत करावी अशी भूमिका मांडत यामुळे नेहमीच ग्रामस्थांनी किती मदत करायची, संस्थेची काही जबाबदारी आहे की नाही हा आमचा प्रश्न आहे."
- प्रल्हाद कदम,
चेअरमन स्कूल कमिटी
खोडाळा हायस्कूल.


Comments
Add Comment

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,

'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा

वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना

खाजगीकरणा विरोधात वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने; ९ ऑक्टोबरला संपाचा इशारा

पालघर : वीज कंपन्यांमधील खाजगीकरण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि

Vasai Factory Fire: वसईत कारखान्याला भीषण आग

वसई: वसईत तुंगारेश्वर फाटा येथील पुठ्ठा कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कारखान्यातील अनेक